शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी शेततळ्यांकडे फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:45 IST

५०० पैकी फक्त ६२ शेततळे पूर्ण, कृषी विभागाने प्रोत्साहन देण्याची गरज

ठळक मुद्देआतापर्यंत ५०० पैकी फक्त ६२ शेततळे पूर्णजिल्ह्यात साक्री तालुक्यातच सर्वाधिक शेततळीशिरपूर तालुक्यात फक्त एक शेततळे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते. असे असले तरी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. शेततळ्यांच्या कामांची टक्केवारी अवघी ८ टक्के आहे. एक प्रकारे शेततळ्यांकडे शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान] शेततळ्यांसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाºया ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत २०१६-१७ व १७-१८  नुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी १२५ प्रमाणे ५००  शेततळ्यांचे नियोजन कृषी विभाागतर्फे करण्यात आलेले होते. त्यानुषंगाने गत नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामासाठी ६२० शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १६७ शेतकºयांना शेततळ्यांसाठी कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. आतापर्यंत फक्त ६२ शेततळे पूर्ण झालेले आहेत. शेततळ्यांची ही टक्केवारी अवघी आठ आहे.सर्वाधिक शेततळी साक्री तालुक्यातजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १२५ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार सर्वाधिक शेततळी साक्री तालुक्यात (५२) झाली. साक्री तालुक्याच्या आसपास एकही तालुका नाही. धुळे तालुक्यात केवळ सहा, शिंदखेडा तालुक्यात तीन, तर शिरपूर तालुक्यात अवघे एक शेततळे झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केलेले आहे. आकारमानानुसार निधीशेततळ्यांचे आकारमानही निश्चित करण्यात आले. त्यानुसार सर्वात लहान १५ बाय १५ बाय ३ मीटर  व सर्वात मोठे ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे हे शेततळे करावयाचे आहे. यासाठी पूर्वी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत ८२ हजार रुपये अनुदान मिळायचे. तर आता यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत असते. प्रोत्साहित करण्याची गरजजिल्ह्यात यावर्षी शेततळ्यांची संख्या नगण्यच आहेत. त्यामुळे शेततळे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कृषी विभागामार्फत प्रोत्साहित करण्याची गरज आहे.