शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट

By admin | Updated: January 14, 2017 00:16 IST

शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे बैठक; शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी करणार प्रय}

पिंपळनेर :  सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या ‘कृषी टास्क’ फोर्सच्या शिफारशी लागू करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून शरद जोशी यांच्या कृषी टास्क या योजनेविषयी जनजागृती करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांनी येथे दिली. येथील मराठा मंगल कार्यालयात  शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे शेतक:यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, धुळे जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, गुलाबसिंग रघुवंशी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोबले, भटू अकलाडे, आत्माराम देसले, सत्तारसिंग उपस्थित होते. यशस्वितेसाठी शांतूभाई पटेल, पोपटराव कुवर, जगन्नाथ राजपूत, भास्करराव काकुस्ते, शांताराम गांगुर्डे, आत्माराम देसले, निंबा जाधव, रमाकांत गांगुर्डे जगदीश नेरकर, धनराज पाटील, चंदू कोठावदे, दत्तात्रय बेडसे यांनी परिश्रम घेतले. शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम अनिल घनवट म्हणाले, की शेतक:यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात शरद जोशी यांच्या ‘कृषी टास्क फोर्सच्या’ शिफारशी लागू करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नसल्याची खंत घनवट यांनी व्यक्त केली. डाळ, हरभरा, गहू, तेलाची आयात व साखर उद्योगावर अनेक र्निबध लादले आहेत. त्यात इथेनॉलच्या किमती कमी केल्यामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ‘मेक इन इंडिया’चा आग्रह धरणा:या सरकारला  शेतक:यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शशिकांत भदाणे यांची निवड बैठकीत अनिल धनवट यांनी शशिकांत भदाणे (पिंपळनेर) यांची शेतकरी संघटनेची तळमळ पाहता उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड केली. तसेच यावेळी शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी गुलाबसिंग बाजीराव रघुवंशी, जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीपदी चित्राबाई निंबा जाधव (रा. छाईल, ता. साक्री) यांची निवड करण्यात आली. नोटाबंदीचा शेतक:यांना फटका नोटाबंदीमुळे देशातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात  सरकारने पीक कर्जावर दोन महिन्याच्या व्याजावर सूट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतक:यांनी वीज बिले माफ करा, कर्जमुक्त करा, शेतीविरोधी कायदे रद्द करावेत, असे घनवट यांनी सांगितले. यावेळी ए. के. पाटील यांनी शेतक:यांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली.