शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट

By admin | Updated: January 14, 2017 00:16 IST

शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे बैठक; शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी करणार प्रय}

पिंपळनेर :  सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या ‘कृषी टास्क’ फोर्सच्या शिफारशी लागू करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून शरद जोशी यांच्या कृषी टास्क या योजनेविषयी जनजागृती करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांनी येथे दिली. येथील मराठा मंगल कार्यालयात  शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे शेतक:यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, धुळे जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, गुलाबसिंग रघुवंशी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोबले, भटू अकलाडे, आत्माराम देसले, सत्तारसिंग उपस्थित होते. यशस्वितेसाठी शांतूभाई पटेल, पोपटराव कुवर, जगन्नाथ राजपूत, भास्करराव काकुस्ते, शांताराम गांगुर्डे, आत्माराम देसले, निंबा जाधव, रमाकांत गांगुर्डे जगदीश नेरकर, धनराज पाटील, चंदू कोठावदे, दत्तात्रय बेडसे यांनी परिश्रम घेतले. शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम अनिल घनवट म्हणाले, की शेतक:यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात शरद जोशी यांच्या ‘कृषी टास्क फोर्सच्या’ शिफारशी लागू करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नसल्याची खंत घनवट यांनी व्यक्त केली. डाळ, हरभरा, गहू, तेलाची आयात व साखर उद्योगावर अनेक र्निबध लादले आहेत. त्यात इथेनॉलच्या किमती कमी केल्यामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ‘मेक इन इंडिया’चा आग्रह धरणा:या सरकारला  शेतक:यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शशिकांत भदाणे यांची निवड बैठकीत अनिल धनवट यांनी शशिकांत भदाणे (पिंपळनेर) यांची शेतकरी संघटनेची तळमळ पाहता उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड केली. तसेच यावेळी शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी गुलाबसिंग बाजीराव रघुवंशी, जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीपदी चित्राबाई निंबा जाधव (रा. छाईल, ता. साक्री) यांची निवड करण्यात आली. नोटाबंदीचा शेतक:यांना फटका नोटाबंदीमुळे देशातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात  सरकारने पीक कर्जावर दोन महिन्याच्या व्याजावर सूट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतक:यांनी वीज बिले माफ करा, कर्जमुक्त करा, शेतीविरोधी कायदे रद्द करावेत, असे घनवट यांनी सांगितले. यावेळी ए. के. पाटील यांनी शेतक:यांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली.