शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

By admin | Updated: January 8, 2017 00:30 IST

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे.

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे. शेतक:यांनी आपल्या जवळील रक्कम बँकेत भरली. दोन महिन्यात रोज रांगेत उभे राहून शेतीसाठी खर्च केला. शेतमाल विकून फक्त लागलेला खर्च निघाला. मिळालेला पैसा धनादेश रूपात बँकेत भरला. आता पुढील पीक घेण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे.शेतक:यांनी सरकारच्या आग्रहानुसार कॅशलेस व्यवहारासाठी एटीएम कार्ड काढले आहे. ते खिशात आहे. परंतु वापर कुठे करावा हा प्रश्न शेतक:यांना पडला आहे. कारण बियाणे, खते, किटकनाशके, शेतमजुरी, पेट्रोल, डिङोल अशा गोष्टी घेण्यासाठी संबंधित दुकानांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही. गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर देखील ही सुविधा नाही. म्हणजेच शेतमाल कृषी बाजारात घेऊन जाईर्पयत कॅशलेस व्यवहार करणे शक्य नाही किंवा तशी सुविधा नाही. मात्र माल विक्रीनंतर रोखीच्या व्यवहारात पुढील तारखेचा धनादेश शेतक:यांना दिला जात आहे. तसेच बँकेत धनादेश टाकण्यापूर्वी आम्हाला विचारुन घ्या, अशी तंबीदेखील दिली जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतमाल व भाजीपाला यांचा लागलेला खर्चदेखील निघत नाही. हातात आलेला धनादेश पुन्हा बँकेत जमा करावा लागत आहे. पैशांसाठी पुन्हा बँकेच्या रांगेत उभे रहावे            लागते.एटीएममध्ये एखाद्या दिवशी पैसे मिळतात. बँकेत एका ग्राहकाला फक्त दोन हजार रुपये दिले जात आहे.रोज रांगेत उभे राहण्यापेक्षा आठवडय़ात एकत्र रक्कम एकाच दिवशी द्यावी, असा आग्रह ग्रामस्थांनी केला. या वेळी अनेकवेळा बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद होत आहे.  नोटाबंदीने शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन महिन्यानंतरदेखील बँकेतील गर्दी कमी झाली नाही. यासाठी गावात कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे किंवा बँकेतून जास्त रक्कम देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी शेतात काम करणेऐवजी रोज बँकेत उभा राहिल्यास शेतीकडे दुर्लक्ष होऊन उत्पादनात घट, शेतमालाचा दर्जा खालावणे, शेतात चोरी होणे अशा अनेकप्रकारे शेतक:यांचे नुकसान होत आहे.