शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

शेतकऱ्यांच्या १९ विहिरी गेल्या चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:14 IST

भडगाव (वर्धाने) येथील प्रकार : पं.स.सदस्याने दिला कंत्राटी कर्मचाºयास चोप, रक्कम हडपल्याचा संशय

आबा सोनवणे।साक्री :आतापर्यंत वस्तू पैसे दागिने चोरीला गेल्याचे ऐकले आहे, परंतु आता साक्री तालुक्यातून चक्क एकोणवीस विहिरी चोरीला गेल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १९ विहिरी एकाच गावातून चोरीला गेल्या आहेत.तालुक्यातील भडगाव (वर्धाने ) येथील एकोणावीस शेतकऱ्यांच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विहिरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. हा प्रकार पंचायत समितीच्या मासिक सभेत उघडकीस आला. बैठकीत पंचायत समिती सदस्य रमेश सरग यांनी जबाबदार असलेल्या एका कंत्राटी कर्मचाºयास चोप दिला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून विहिरीच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. पोकलन व जेसीबी मशिनच्या साह्याने या विहिरी त्वरित पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे.तालुक्यातील भडगाव (वर्धाने ) येथे १९ शेतकºयांच्या विहिरी मंजूर झाल्या होत्या. यापैकी पाच शेतकºयांच्या विहिरींना सन २०१५ मध्येच मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित १४ विहिरींना २०१७ मध्ये मंजुरी मिळाली आहे. याविहिरी पूर्ण व्हाव्यात म्हणून लाभार्थी शेतकरी पंचायत समितीमध्ये अनेक दिवसापासून चकरा मारून मारून थकले आहेत. त्यांना अधिकारी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीचे उत्तरे देऊन परत पाठवत होते. यासंदर्भात लाभार्थी शेतकºयांपैकी संतोष भटू कारंडे हे विहिरीचे मस्टर टाकावे म्हणून पंचायत समिती साक्री येथे ३ जून रोजी आले होते. त्यावेळी पंचायत समितीची मासिक बैठक होती. विहिरींची तक्रार त्यांनी पंचायत समिती सदस्य रमेश सरग यांच्याकडे केली असता बैठकीतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी त्यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्याकडे केली. तसेच भडगाव येथील किती शेतकºयांना आतापर्यंत विहिरींचे किती पैसे देण्यात आले आहेत याचे रेकॉर्ड तपासले. त्यावेळी संतोष कारंडे यांच्या विहिरीचे ६६ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचे समोर आले. यानंतर पंचायत समिती सदस्य रमेश सरग आक्रमक होऊन संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला चांगला चोप दिला.या सर्व शेतकºयांनी विहीर मंजूर करण्यासाठी कनिष्ठपासून वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत प्रत्येकी दहा हजार रुपये लाच दिली असल्याचेही शेतकºयांचे म्हणणे आहे. शासन शेतकºयांना खोदकामासाठी दोन लाख ९० हजार रुपयांचे अनुदान देते. जेणेकरून शेतकºयांना शेती बागायती करता यावी, आपले जीवनमान सुधारता यावे. परंतु शासन यंत्रणेतील झारीतील शुक्राचार्य कसे काम करतात, शासकीय अनुदानावर कसा डल्ला मारतात चांगल्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ करतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. एवढे गंभीर प्रकरण समोर आल्यावर गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांना याचे कोणतेही सोयरसुतक दिसून आले नाही. संबंधित रोजगार सेवक कंत्राटी कर्मचारी ही विहीर पूर्ण करून देणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. वास्तविक विहीर पूर्ण न करता परस्पर पैसे काढण्यात आले याची खातरजमा स्वत: गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी केल्यावरही या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम मात्र सुरू आहे. या प्रकरणात समजलेल्या माहितीनुसार व अधिकाºयांच्या सल्यानुसार दुसºयाच दिवशी जेसीबी व पोकलेन मशीनचे कामे घाईगडबडीने सुरू करण्यात आली आहेत. याची वरिष्ठ अधिकाºयांनी त्वरित दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी. तसेच या विहिरींचे मस्टरवर मजूर दाखवून पैसे काढण्यात आले आहेत त्या सर्व मजुरांचे जबाब घेण्यात यावेत. ज्या बॅँकेतून हे पैसे काढले त्या बँकेच्या अधिकाºयांचीही ही चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात प्रशासन आता काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लागलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे