शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

By अतुल जोशी | Updated: March 31, 2023 15:48 IST

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

धुळे: कोरडवाहू क्षेत्रातील शेती ही पूर्णत: पावसावरच अवलंबून असते. मात्र काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाल्याने, त्याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ लागला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये, सिंचन क्षमता वाढावी यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैय्यक्तिक शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षासाठी लॅाटरी पद्धतीने १०१ जणांची निवड करण्यात आली. मात्र केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

शासनाच्या कृषी विभागाकडून सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे ही याेजना सन २०१६ पासून सुरूकरण्यात आली.  २०१६-१७  या वर्षासाठी जिल्ह्याला ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात धुळे तालुका १००, साक्री तालुका २५० व शिरपूर व शिंदखेडा तालुक्याला ७५-७५ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६३ शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ १५० शेतकऱ्यांनीच शेततळे पूर्ण केले. त्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आलीहोती.  आता  शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन याेजनेचा विस्तार करून वैयक्तीक शेतकऱ्यांचा यंदापासून या याेजनेत समावेश केला.  र जिल्ह्यातही या याेजनेची अंमलबजात्तणी सुरू झाली. २०२२-२३ या वर्षासाठी  जिल्ह्याला  २६० शेततळ्याचे उद्दिष्ट  निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ॲानलाइन १०३ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यातील दहा जणांना पूर्व संमीती दिलेली आहे. . मात्र प्रत्यक्षात केवळ चारच ठिकाणी कामांना सुरूवात झाली आहे.

त्यात धुळे तालुक्यात एक व साक्री तालुक्यातील तीन शेततळ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेततळे याेजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDhuleधुळे