शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम

By अतुल जोशी | Updated: March 31, 2023 15:48 IST

केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

धुळे: कोरडवाहू क्षेत्रातील शेती ही पूर्णत: पावसावरच अवलंबून असते. मात्र काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाल्याने, त्याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ लागला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये, सिंचन क्षमता वाढावी यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैय्यक्तिक शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षासाठी लॅाटरी पद्धतीने १०१ जणांची निवड करण्यात आली. मात्र केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

शासनाच्या कृषी विभागाकडून सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे ही याेजना सन २०१६ पासून सुरूकरण्यात आली.  २०१६-१७  या वर्षासाठी जिल्ह्याला ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात धुळे तालुका १००, साक्री तालुका २५० व शिरपूर व शिंदखेडा तालुक्याला ७५-७५ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६३ शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ १५० शेतकऱ्यांनीच शेततळे पूर्ण केले. त्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आलीहोती.  आता  शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन याेजनेचा विस्तार करून वैयक्तीक शेतकऱ्यांचा यंदापासून या याेजनेत समावेश केला.  र जिल्ह्यातही या याेजनेची अंमलबजात्तणी सुरू झाली. २०२२-२३ या वर्षासाठी  जिल्ह्याला  २६० शेततळ्याचे उद्दिष्ट  निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ॲानलाइन १०३ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यातील दहा जणांना पूर्व संमीती दिलेली आहे. . मात्र प्रत्यक्षात केवळ चारच ठिकाणी कामांना सुरूवात झाली आहे.

त्यात धुळे तालुक्यात एक व साक्री तालुक्यातील तीन शेततळ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेततळे याेजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDhuleधुळे