शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाड्यातून पाणी सोडा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 17:30 IST

शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची पाय पडून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

राजेंद्र शर्मा, लोकमत, धुळे: पांझरा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून त्यासाठी पाणी सोडावे, असे मागणी करणारे पत्र शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी बुधवारी प्रा.पाटील यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

यावेळी चर्चा करताना प्रा.पाटील यांनी, साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, असे सांगितले. यावेळी प्रा.शरद पाटील यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत किंवा दोन दिवसात जर पाणी सोडले नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर महिन्याभरापासून याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

शेवटी बुधवारी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदखेडा तालुक्यात वाडी शेवाडी आणि अमरावती धरणातून पाणी सोडले जाते. म्हणजे ज्याठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्याठिकाणी लगेच पाणी सोडले जाते. मग धुळे तालुक्यात अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यास काय अडचण होत आहे, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारला. म्हणजे ज्याठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत, अशा ठिकाणी जाणूनबुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप केला.

यावेळी प्रा.शरद पाटील यांनी अचानकपणे हात जोडून साहेब तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. अचानकपणे हे घडल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, अशी विनंती केली. बुधवारी सायंकाळपर्यंत अथवा दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिला.

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना