शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाड्यातून पाणी सोडा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 17:30 IST

शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची पाय पडून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

राजेंद्र शर्मा, लोकमत, धुळे: पांझरा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून त्यासाठी पाणी सोडावे, असे मागणी करणारे पत्र शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी बुधवारी प्रा.पाटील यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

यावेळी चर्चा करताना प्रा.पाटील यांनी, साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, असे सांगितले. यावेळी प्रा.शरद पाटील यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत किंवा दोन दिवसात जर पाणी सोडले नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर महिन्याभरापासून याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

शेवटी बुधवारी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदखेडा तालुक्यात वाडी शेवाडी आणि अमरावती धरणातून पाणी सोडले जाते. म्हणजे ज्याठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्याठिकाणी लगेच पाणी सोडले जाते. मग धुळे तालुक्यात अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यास काय अडचण होत आहे, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारला. म्हणजे ज्याठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत, अशा ठिकाणी जाणूनबुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप केला.

यावेळी प्रा.शरद पाटील यांनी अचानकपणे हात जोडून साहेब तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. अचानकपणे हे घडल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, अशी विनंती केली. बुधवारी सायंकाळपर्यंत अथवा दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिला.

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना