शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाड्यातून पाणी सोडा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 17:30 IST

शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची पाय पडून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

राजेंद्र शर्मा, लोकमत, धुळे: पांझरा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून त्यासाठी पाणी सोडावे, असे मागणी करणारे पत्र शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी बुधवारी प्रा.पाटील यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

यावेळी चर्चा करताना प्रा.पाटील यांनी, साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, असे सांगितले. यावेळी प्रा.शरद पाटील यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत किंवा दोन दिवसात जर पाणी सोडले नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर महिन्याभरापासून याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

शेवटी बुधवारी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदखेडा तालुक्यात वाडी शेवाडी आणि अमरावती धरणातून पाणी सोडले जाते. म्हणजे ज्याठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्याठिकाणी लगेच पाणी सोडले जाते. मग धुळे तालुक्यात अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यास काय अडचण होत आहे, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारला. म्हणजे ज्याठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत, अशा ठिकाणी जाणूनबुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप केला.

यावेळी प्रा.शरद पाटील यांनी अचानकपणे हात जोडून साहेब तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. अचानकपणे हे घडल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, अशी विनंती केली. बुधवारी सायंकाळपर्यंत अथवा दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिला.

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना