शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:44 IST

कृषि यांत्रिकीकरण दिवस : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

ठळक मुद्दे विविध अवजारांचे भरविण्यात आले प्रदर्शननवीन अवजारे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कारजिल्ह्यातील शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भारत हा कृषिप्रधान देश असून, नवीन भारत घडवायचा असेल तर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात यंत्राचे महत्व वाढलेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवीदिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कृषी विज्ञान केंद्र धुळे,कृषी विभाग धुळे, महाराष्टÑ कृषी अवजारे उत्पादक संघटना धुळे व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण दिवस व सुधारित कृषी अवजाराचे प्रदर्शनाच्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. बबनराव पाटील, नंदुरबारचे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. प्रकाश तुरबतमठ, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, प्रा. तुळशीदास बास्टेवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते. रावल म्हणाले एकीकडे देशात बेरोजगारी वाढते आहे, तर दुसरीकडे शेतात मजुर मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मजुरांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी यांत्रिकीकरणाकडे वळले पाहिजे. शेतकºयांनीही शेतीत झालेले बदल अंगिकारले पाहिजे. डॉ. शरद गडाख म्हणाले की, जिरायत व बागायती शेती करणाºया शेतकºयाला भरीव उत्पन्न मिळावे यासाठी विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. डॉ. अशोक मुसमाडे यांनी यांत्रिकीकरणामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते असे सांगितले. यावेळी शेतीला उपयुक्त नवनवीन यंत्रे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. तुळशीदास बास्टेवाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश काथापुरे यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.