शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:44 IST

कृषि यांत्रिकीकरण दिवस : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

ठळक मुद्दे विविध अवजारांचे भरविण्यात आले प्रदर्शननवीन अवजारे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कारजिल्ह्यातील शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भारत हा कृषिप्रधान देश असून, नवीन भारत घडवायचा असेल तर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात यंत्राचे महत्व वाढलेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवीदिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कृषी विज्ञान केंद्र धुळे,कृषी विभाग धुळे, महाराष्टÑ कृषी अवजारे उत्पादक संघटना धुळे व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण दिवस व सुधारित कृषी अवजाराचे प्रदर्शनाच्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. बबनराव पाटील, नंदुरबारचे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. प्रकाश तुरबतमठ, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, प्रा. तुळशीदास बास्टेवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते. रावल म्हणाले एकीकडे देशात बेरोजगारी वाढते आहे, तर दुसरीकडे शेतात मजुर मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मजुरांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी यांत्रिकीकरणाकडे वळले पाहिजे. शेतकºयांनीही शेतीत झालेले बदल अंगिकारले पाहिजे. डॉ. शरद गडाख म्हणाले की, जिरायत व बागायती शेती करणाºया शेतकºयाला भरीव उत्पन्न मिळावे यासाठी विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. डॉ. अशोक मुसमाडे यांनी यांत्रिकीकरणामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते असे सांगितले. यावेळी शेतीला उपयुक्त नवनवीन यंत्रे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. तुळशीदास बास्टेवाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश काथापुरे यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.