शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

बहिणाबाईंच्या कवितेत जीवनाचे सार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST

साक्री येथील सि.गो. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. ...

साक्री येथील सि.गो. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, पर्यवेक्षक प्रा.डी.पी.पाटील आदी उपस्थित होते.

प्रा.एल.जी. सोनवणे पुढे म्हणाले की, चौकटीतले शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाईंचे समाजाविषयीचे आकलन अतुलनीय होते. याच आकलनातून त्यांनी आपल्या कवितेत दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांवर, रूढी-परंपरांवर भाष्य केले आहे.

डॉ. राजेंद्र अहिरे यांनी, कवयित्री बहिणाबाईंच्या साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे नमूद केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने रूपांतरित होणे हा बहिणाबाईंचा व साहित्याचा सन्मान आहे.याप्रसंगी त्यांनी बहिणाबाईंची ‘घरोट’ ही कविता सादर केली. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात डॉ ज्योती वाकोडे, प्रा.सचिन वाघ, डॉ.पी.एस. साळुंखे, डॉ.चंद्रकांत कढरे, गायत्री सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या.

सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंखे यांनी तर आभार प्रा.विश्वास भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी परिश्रम घेतले.