शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

काही वर्षांपूर्वी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाऊस नसल्याने, खरीप व रब्बी हंगामातही मर्यादित उत्पन्न हाती येत होते. ...

काही वर्षांपूर्वी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाऊस नसल्याने, खरीप व रब्बी हंगामातही मर्यादित उत्पन्न हाती येत होते. त्याचा परिणाम चारा टंचाईवर होत होता. जानेवारीपासूनच गुरांच्या चाऱ्याची चणचण भासत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही चांगले उत्पन्न येत आहे. यामुळे पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाईही संपुष्टात आलेली आहे.

जिल्ह्यात जनावरांची संख्या १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. २०२० मध्ये झालेल्या खरीप हंगामातील पिकापासून ३ लाख ५० हजार १५० मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. या शिवाय २०२० मधील रब्बी पिकांपासून १ लाख ५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. पशुसंवर्धन विभाग व डीपीसी निधीतून ३१ हजार ५६३ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. असा एकूण ४ लाख ८६ हजार ७१३ मेट्रिक टन चारा जुलै २१ अखेरपर्यंत उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले.

दररोज ३४७० मे.टन चारा आवश्यक

जिल्ह्यातलहान-मोठ्या गुरांची एकूण संख्या तब्बल १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. या गुरांसाठी दररोज ३ हजार ४७० मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरीप व रब्बी हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता आहे, तेवढा सहज उपलब्ध होत आहे.

दुसऱ्या जिल्ह्यातून आयात करण्याची गरज नाही

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने, पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागत होता. अनेक पशुपालक आपल्या गुरांसाठी जादा पैसे देऊन चाऱ्याची आयात करीत होते. तर काहींना चारा घेणे शक्य होत नसल्याने, असे पशुपालक पशुधन विक्री करीत होते. मात्र दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, दुसऱ्या जिल्ह्यातून चारा आयात करण्याची गरज भासत नाही.