शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

काही वर्षांपूर्वी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाऊस नसल्याने, खरीप व रब्बी हंगामातही मर्यादित उत्पन्न हाती येत होते. ...

काही वर्षांपूर्वी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाऊस नसल्याने, खरीप व रब्बी हंगामातही मर्यादित उत्पन्न हाती येत होते. त्याचा परिणाम चारा टंचाईवर होत होता. जानेवारीपासूनच गुरांच्या चाऱ्याची चणचण भासत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही चांगले उत्पन्न येत आहे. यामुळे पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाईही संपुष्टात आलेली आहे.

जिल्ह्यात जनावरांची संख्या १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. २०२० मध्ये झालेल्या खरीप हंगामातील पिकापासून ३ लाख ५० हजार १५० मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. या शिवाय २०२० मधील रब्बी पिकांपासून १ लाख ५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. पशुसंवर्धन विभाग व डीपीसी निधीतून ३१ हजार ५६३ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. असा एकूण ४ लाख ८६ हजार ७१३ मेट्रिक टन चारा जुलै २१ अखेरपर्यंत उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले.

दररोज ३४७० मे.टन चारा आवश्यक

जिल्ह्यातलहान-मोठ्या गुरांची एकूण संख्या तब्बल १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. या गुरांसाठी दररोज ३ हजार ४७० मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरीप व रब्बी हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता आहे, तेवढा सहज उपलब्ध होत आहे.

दुसऱ्या जिल्ह्यातून आयात करण्याची गरज नाही

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने, पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागत होता. अनेक पशुपालक आपल्या गुरांसाठी जादा पैसे देऊन चाऱ्याची आयात करीत होते. तर काहींना चारा घेणे शक्य होत नसल्याने, असे पशुपालक पशुधन विक्री करीत होते. मात्र दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, दुसऱ्या जिल्ह्यातून चारा आयात करण्याची गरज भासत नाही.