शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळ्यात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:52 IST

सांस्कृतिक : देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन व भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे आयोजन

ठळक मुद्देजलदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचविण्याचा संदेश. दोन दिवसीय जल साहित्य संमेलनात ‘खान्देशचे जल’ या विषयावर होणार विचारमंथनरविवार, २१ रोजी दुपारी संमेलनाचा होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन, भारतीय जल संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळे शहरातील देवपूर परिसरातील नकाणेरोडवरील वेदांत मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी थाटात सुरुवात झाली.  संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत जिल्ह्यातील नद्यांचे पाणी एका कलशात संकलित करून त्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी 'पाणी हेच जीवन',  'पाण्याचा वापर जपून करावा' असा संदेश दिला. यावेळी स्वागताध्यक्ष रावसाहेब बढे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, संमेलन समितीचे सचिव डॉ. संजय पाटील, संजय झेंडे आदी उपस्थित होते. शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडीला सुरुवात झाली. पुढे ही दिंडी इंदिरा गार्डन, प्रमोद नगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया, तुळशीराम नगर, नकाणेरोडमार्गे संमेलनस्थळी आली. मान्यवरांच्या हस्ते उदघाटन जलदिंडीच्या मिरवणुकीची सांगता वेदांत मंगल कार्यालयात झाली. त्यानंतर मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या देशबंधू गुप्ता नगरी येथे  मुकुंद धाराशिवकर विचारमंच येथे संमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आंतरराष्टÑीय ख्यातीचे जलतज्ज्ञ तथा संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, दत्ता देशकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जितेंद्र तलवारे, डॉ. संजय पाटील, जलतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनाने वेधले लक्षसंमेलनाच्या निमित्ताने मंगल कार्यालयाच्या प्रांगणात जलसाक्षरता प्रदर्शन भरविण्यात आले होते.  या प्रदर्शनातून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

आमदार कुणाल पाटील यांना पुरस्कार जलसंधारणाची कामे करून जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणणाºया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते जलगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पुस्तक प्रकाशनसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुकुंद धाराशिवकर लिखित द्रष्टे एम. व्ही. (सर विश्वेश्वरेय्या) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सूञसंचालन प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. आभार जल संस्कृती मंडळाचे गजानन देशपांडे यांनी मानले.