शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST

यावर्षी दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावरच निकाल जाहीर ...

यावर्षी दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावरच निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे २८ हजार ५६५ पैकी २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. निकालाची टक्केवारी ९९.९८ टक्के एवढी होती.

दरम्यान, निकाल मोठ्या प्रमाणात लागल्याने, अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला होता; मात्र उच्च न्यायालयाने अकरावीसाठी सीईटी रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. टक्के चांगले असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे कल आहे.

शहरात विज्ञान शाखेच्या ५२००, कला शाखेच्या १९६० तर वाणिज्य शाखेच्या ४०० जागा आहेत.

२० ते २४ ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली होती. २७ रोजी सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

येथील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ९१ टक्क्यांवर तर वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी ९० टक्क्यांवर क्लोज झाल्याची माहिती प्राचार्य डॅा.पी.एच. पवार यांनी दिली. या महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी १४०० तर वाणिज्य शाखेसाठी ५०० जणांनी नोंदणी केलेली होती. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ३६० व वाणिज्य शाखेच्या २४० जागा आहेत तर कला शाखेच्या १२० जागा आहेत.

शहरातील एसएसव्हीपीएसच्या घोगरे विज्ञान महाविद्यालयात ११वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ७० टक्यांवर क्लोज झाली. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित ४४० व विनाअनुदानितच्या २२० जागा आहेत. या महाविद्यालयात प्रवेशासाठी १२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती, अशी माहिती प्राचार्य एम.व्ही.पाटील यांनी दिली.

यादी बघण्यासाठी गर्दी

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होणार असल्याने, सकाळपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केेली होती. अनेक विद्यार्थी पालकांसह महाविद्यालयात दाखल झाले होते. ही यादी ऑनलाइन तसेच महाविद्यालयात दर्शनी भागात फलकावर लावण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून येऊन यादीत आपले नाव आहे का ते शोधले.

गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.