शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, ...

आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक

दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे येथील दोन शेतकरी कुटुंबे घराला आग लागल्याने पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. गृहोपयोगी साहित्यासह धान्य, बियाणे, आयुष्याची रोख पुंजी जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत. आज त्यांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला, पण उद्याचे काय? असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

दोडाईचापासून सात किमी लांब असलेल्या रहिमपुरे गावची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. सर्वांची गुजराण शेतीवरच चालते. काका निंबा नथा पाटील व पुतण्या विश्वास गोरख पाटील शेजारी राहतात. दोघांचा ओटा एक व सामायिक भिंत असलेले घर. काल रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झाले. ६५ वर्षीय निंबा पाटील व ६० वर्षीय सुमन पाटील या वयोवृद्ध दाम्पत्यास मूलबाळ नाही. पुढील आयुष्यात पैसे उपयोगी पडावे म्हणून काबाडकष्ट करून त्यांनी पैसा जमा केला. हरभरा विकून व विकास सोसायटीतून पीक कर्ज काढून घरात ७ लाख रुपयांची रोकड ठेवली होती. या पैशातून ते घर बांधणार होते व उर्वरित रक्कम पुढील आयुष्यासाठी ठेवणार होते. उतार वयात पैशाचा आधार असावा म्हणून ते रोख पैसे घरातच ठेवत होते. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर अंगणात फिरत असताना शेजाऱ्यांना निंबा पाटील यांच्या घरातून धूर येताना दिसला. लगेच साडेनऊच्यादरम्यान सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. गावकऱ्यांनी आग शमविण्यासाठी गावातून पाणी आणले. दोंडाईचा-शिंदखेडा येथील अग्निशमन बंब आले, तरीही मोठ्याप्रमाणातील आगीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. आगीत निंबा पाटील यांचे राहते घर, ७ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, घरातील सामान, धान्य, हरभरा जळून खाक झाला. त्या दाम्पत्याच्या अंगावर उरले फक्त त्यांचे कपडे. नातेवाईक व गावकऱ्यांनी आज त्यांना मदत केली;पण उद्याचे काय?असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या आहे.

त्यांचे शेजारी, नात्याने पुतणे विश्वास गोरख पाटील दोडाईचाला मका फॅक्टरीत कामाला आहेत. आगीत दीड लाख रोकड, सोन्याचे दागिने, फ्रीज, टीव्ही, घरगुती साहित्य, रासायनिक खत, शिलाई मशीन, फॅन जळून खाक झाला. शून्यातून पुन्हा सर्व उभे कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते आता कोठून आणणार, पेरणी कशी करणार, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत. आज राहायला घर नाही, खाण्यास धान्य नाही, कपडे नाहीत. पुढील आयुष्य जगायचे तरी कसे?हा प्रश्न पडला आहे.