शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, ...

आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक

दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे येथील दोन शेतकरी कुटुंबे घराला आग लागल्याने पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. गृहोपयोगी साहित्यासह धान्य, बियाणे, आयुष्याची रोख पुंजी जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत. आज त्यांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला, पण उद्याचे काय? असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

दोडाईचापासून सात किमी लांब असलेल्या रहिमपुरे गावची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. सर्वांची गुजराण शेतीवरच चालते. काका निंबा नथा पाटील व पुतण्या विश्वास गोरख पाटील शेजारी राहतात. दोघांचा ओटा एक व सामायिक भिंत असलेले घर. काल रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झाले. ६५ वर्षीय निंबा पाटील व ६० वर्षीय सुमन पाटील या वयोवृद्ध दाम्पत्यास मूलबाळ नाही. पुढील आयुष्यात पैसे उपयोगी पडावे म्हणून काबाडकष्ट करून त्यांनी पैसा जमा केला. हरभरा विकून व विकास सोसायटीतून पीक कर्ज काढून घरात ७ लाख रुपयांची रोकड ठेवली होती. या पैशातून ते घर बांधणार होते व उर्वरित रक्कम पुढील आयुष्यासाठी ठेवणार होते. उतार वयात पैशाचा आधार असावा म्हणून ते रोख पैसे घरातच ठेवत होते. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर अंगणात फिरत असताना शेजाऱ्यांना निंबा पाटील यांच्या घरातून धूर येताना दिसला. लगेच साडेनऊच्यादरम्यान सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. गावकऱ्यांनी आग शमविण्यासाठी गावातून पाणी आणले. दोंडाईचा-शिंदखेडा येथील अग्निशमन बंब आले, तरीही मोठ्याप्रमाणातील आगीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. आगीत निंबा पाटील यांचे राहते घर, ७ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, घरातील सामान, धान्य, हरभरा जळून खाक झाला. त्या दाम्पत्याच्या अंगावर उरले फक्त त्यांचे कपडे. नातेवाईक व गावकऱ्यांनी आज त्यांना मदत केली;पण उद्याचे काय?असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या आहे.

त्यांचे शेजारी, नात्याने पुतणे विश्वास गोरख पाटील दोडाईचाला मका फॅक्टरीत कामाला आहेत. आगीत दीड लाख रोकड, सोन्याचे दागिने, फ्रीज, टीव्ही, घरगुती साहित्य, रासायनिक खत, शिलाई मशीन, फॅन जळून खाक झाला. शून्यातून पुन्हा सर्व उभे कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते आता कोठून आणणार, पेरणी कशी करणार, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत. आज राहायला घर नाही, खाण्यास धान्य नाही, कपडे नाहीत. पुढील आयुष्य जगायचे तरी कसे?हा प्रश्न पडला आहे.