शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकºयांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:47 IST

जिल्ह्यातील १९० लाभार्थ्यांना १९ लाखांची उचल . आधार कार्डच्या दुरूस्तीसाठी शेतकºयांची फिरफिर.

ठळक मुद्दे८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी भरले अर्ज १९० शेतकºयांनी सादर केले ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र २१ लाख ६३ हजार ९६४ जणांनी केली आधार नोंदणी

आॅनलाईन लोकमत

धुळे, दि.१२ : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांनी महाआॅनलाइनच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज सादर करावे, असे शासनाने सूचित केले होते. परंतु, मंगळवारी शहरातील महा-ई सेवा केंद्रामध्ये दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकºयांची पायपीट झाली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १९ लाभार्थ्यांना शपथपत्राची १९ लाखाची रक्कम वितरीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्टÑीयकृत बॅँका उचल देण्यास अग्रेसर शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णयासोबत शेतकºयांना कर्जमाफीसोबत तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले होते. त्यासाठी शेतकºयांना शपथपत्र सादर करणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १९० शेतकºयांनी ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे २३ सभासद व राष्टÑीयकृत बॅँकेच्या १६७ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना दहा हजारांची उचल मिळाली आहे. ८७ हजार ४८५ शेतकºयांनी भरले अर्ज धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहे. परंतु, अजुनही काही शेतकºयांना हे अर्ज भरताना अडचणी येत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरताना शेतकºयांना नानाविध अडचणी येत आहेत; तर काही शेतकºयांना त्यांच्या आधारकार्डवरील पत्ता किंवा नावात बदल झाल्यामुळे त्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ९९ टक्के आधार नोंदणी धुळे जिल्ह्यात २१ लाख ६९ हजार ५०४ इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी २१ लाख ६३ हजार ९६४ इतक्या जणांनी आधार नोंदणी केली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आधार नोंदणी झाली असून आधार नोंदणीसाठी किट प्राप्त होताच, ही नोंदणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाइन केंद्रात दररोज हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून सर्व्हर बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. - समाधान पाटील, शेतकरी

आॅनलाइन अर्ज भरताना आधार कार्डवरील चुकांमुळे अर्ज भरलेच जात नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. - महादू पाटील, शेतकरी