शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकºयांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:47 IST

जिल्ह्यातील १९० लाभार्थ्यांना १९ लाखांची उचल . आधार कार्डच्या दुरूस्तीसाठी शेतकºयांची फिरफिर.

ठळक मुद्दे८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी भरले अर्ज १९० शेतकºयांनी सादर केले ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र २१ लाख ६३ हजार ९६४ जणांनी केली आधार नोंदणी

आॅनलाईन लोकमत

धुळे, दि.१२ : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांनी महाआॅनलाइनच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज सादर करावे, असे शासनाने सूचित केले होते. परंतु, मंगळवारी शहरातील महा-ई सेवा केंद्रामध्ये दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकºयांची पायपीट झाली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १९ लाभार्थ्यांना शपथपत्राची १९ लाखाची रक्कम वितरीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्टÑीयकृत बॅँका उचल देण्यास अग्रेसर शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णयासोबत शेतकºयांना कर्जमाफीसोबत तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले होते. त्यासाठी शेतकºयांना शपथपत्र सादर करणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १९० शेतकºयांनी ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे २३ सभासद व राष्टÑीयकृत बॅँकेच्या १६७ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना दहा हजारांची उचल मिळाली आहे. ८७ हजार ४८५ शेतकºयांनी भरले अर्ज धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहे. परंतु, अजुनही काही शेतकºयांना हे अर्ज भरताना अडचणी येत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरताना शेतकºयांना नानाविध अडचणी येत आहेत; तर काही शेतकºयांना त्यांच्या आधारकार्डवरील पत्ता किंवा नावात बदल झाल्यामुळे त्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ९९ टक्के आधार नोंदणी धुळे जिल्ह्यात २१ लाख ६९ हजार ५०४ इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी २१ लाख ६३ हजार ९६४ इतक्या जणांनी आधार नोंदणी केली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आधार नोंदणी झाली असून आधार नोंदणीसाठी किट प्राप्त होताच, ही नोंदणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाइन केंद्रात दररोज हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून सर्व्हर बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. - समाधान पाटील, शेतकरी

आॅनलाइन अर्ज भरताना आधार कार्डवरील चुकांमुळे अर्ज भरलेच जात नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. - महादू पाटील, शेतकरी