शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात मिरचीची आवक वाढल्याने दरात घसरण

By admin | Updated: May 20, 2017 17:26 IST

निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे.

ऑनलाइन लोकमतदोंडाईचा, धुळे, दि. 20 -   कापसाला हमी भाव न मिळाल्याने दोंडाईचासह परिसरातील शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळला. परिणामी परिसरात मिरचीचे क्षेत्र वाढले. मिरची लागवडीनंतर निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढली असली तरी बाजारपेठेत मिरचीचे भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी दोंडाईचासह परिसरातील अनेक शेतक:यांनी  मिरची लागवडीवर भर दिला. त्यामुळे यावर्षी मिरचीची आवक प्रचंड वाढली. मात्र, गत वर्षाच्या तुलनेत सुमारे 900 रुपये भाव कमी झाल्याने शेतक:यांचे आर्थिक गणित बिघडले असून त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. दोंडाईचा बाजार समितीत मिरचीची आवक लक्षणीय असते. येथील मिरची उद्योग खान्देशात आघाडीवर आहे. शिंदखेडा रस्त्यावर 10 ते 11 ठिकाणी मिरची वाळवण्याच्या पथारी आहेत. सुमारे 400 अकुशल कामगारांना रोजगार यामाध्यमातून मिळत आहे. सहा महिने कामगारांना हे काम करावे लागत असल्याने त्यांच्याही कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यात त्यांना अडचणी येत नाही. तसेच येथे तयार होणारी मिरची पावडर परदेशातही पाठविली जाते. 2015-16 ला 3 हजार 888 क्विंटल मिरचीची आवक झाली. त्यामुळे बाजारात 1 कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. त्यावेळी सरासरी प्रति क्विंटल 2 हजार 966 रुपये भाव होता. यावर्षी म्हणजे 2016-2017 या आर्थिक वर्षात 77 हजार 215 मिरचीची आवक झाली असून बाजारात 15 कोटी 86 लाख 48 हजार 492 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. मिरचीचा सरासरी प्रति क्विंटल दर 2 हजार 55 रुपये होता.  निसर्गाची कृपा, मिरची लागवडीचे वाढलेले क्षेत्र, बळीराजाने योग्य वेळी मात्रानुसार दिलेले खत, पाणी किटकनाशके, त्यामुळे मिरचीचे उत्पादन वाढले. गत वर्षापेक्षा यावर्षी मिरचीचे उत्पादन म्हणजे आवक तब्बल 19 पटीने वाढली आहे.  उत्पादन वाढले असले तरी भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.  दोंडाईचालगत परिसरात असलेल्या मिरचींच्या पथारीवर सुमारे 400 अकुशल कामगारांना नोव्हेंबर ते मे असे सहा महिने रोजगार मिळतो. ओली मिरची खुडण्यासाठी एका मनाला 40 रुपये तर कोरडी मिरची खुडण्यासाठी एका कामगाराला 200 रुपये मजुरी मिळते. दोंडाईचा येथील मिरची राजस्थान, गुजरातसह गुंटुरला विक्रीसाठी पाठविली जाते.  यावर्षी गुटुंर येथील बाजारपेठेतही मिरचीचे भाव कमी मिळाले आहे. गेल्यावर्षी दंडी कट मिरची 150 ते 200 रुपये दराने मिळत होती. यावर्षी 900 ते 100 रुपये असा भाव मिळाला आहे.  दोंडाईचा शिवार व परिसरातील पथारीवर कामगार भर उन्हात मिरचीच्या बी जमा करण्याचे काम करत आहेत. मिरचीची बी 25 रुपये किलोने विकली जाते. तिखटामध्ये टाकण्यास व मिरचीचे रोप तयार करण्यासाठी ही बी उपयुक्त ठरते.