शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

धुळे : कोरोनामुळे वाहनचालक आणि मालकांचे उत्पन्न घटले आहे. याउलट खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळे भागवायचे कसे, असा प्रश्न ...

धुळे : कोरोनामुळे वाहनचालक आणि मालकांचे उत्पन्न घटले आहे. याउलट खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळे भागवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

सर्वाधिक नुकसान खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक आणि रिक्षाचालकांचे होत आहे. कोरोनामुळे नागरिक बाहेर पडत नाहीत. बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या निम्म्यापेक्षा खाली आली आहे. त्याच प्रमाणात उत्पन्नदेखील घटले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. थोडीफार कमाई होते म्हणून वाहन रोज रस्त्यावर काढावे लागते. घसारा होतो, दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो. उत्पन्न घटले असले तरी खर्च मात्र वाढला आहे.

तसेच शेकडो वाहनचालक मोठे अधिकारी आणि श्रीमंत लोकांच्या खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. कोरोनामुळे हे सर्वजण घरातच असल्याने त्यांच्या गाड्यादेखील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये किंवा बंगल्यात पार्क करून पडल्या आहेत. वाहनचालकांचा रोजगार बंद झाल्यासारखा आहे. काही मालक आपल्या वाहनचालकांना तरीही मदत करताना दिसत आहेत. असे असले तरी काम बंद झाल्याने अडचणी येत आहेत.

बदली चालक म्हणून काम करणाऱ्या वाहनचालकांची परिस्थिती देखील वाईट आहे. घर कसे चालवावे असा प्रश्न वाहनचालक आणि मालकांपुढे आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन झाले. कोरोनामुळे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दिवाळीनंतर काहीशी सुधारणा झाली. चांगले दिवस येत असतानाच पुन्हा यंदाच्या मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आणि निर्बंध आले. त्यामुळे अनेक वाहनचालक आणि मालकांनी गाड्या, रिक्षा घरी लावून वेगळा व्यवसाय, वेगळे काम सुरू करून उदरनिर्वाह भागविण्याला प्राधान्य दिले आहे.

वाहन सुरू, पण गॅरेज बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले असले तरी अत्यावश्यक सेवा म्हणून जवळपास सर्वच वाहनांची रस्त्यांवर वर्दळ आहे. सर्वच वाहने सुरू आहेत. माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने महामार्गांवर ट्रकची संख्या मोठी आहे. वाहने सुरू असली तरी गॅरेज मात्र बंद आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून महामार्गांवर तसेच शहरात दिलेल्या वेळेत गॅरेज सुरू असल्याचे चित्र आहे.

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

कोरोनामुळे वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर आहे. खासगी वाहनांच्या बाबतीत फारसी अडचण नाही. कारण कुटुंबांना घरातच राहण्याचा सल्ला आहे; परंतु खासगी प्रवासी वाहनांवरील चालकांचे मात्र हाल आहेत. त्यांची वाहने सुरू असली तरी प्रवासी संख्या घटली आहे. दुरुस्तीसाठी गॅरेज नाही आणि पैशांचीही अडचण आहे.

वाहने पार्किंगमध्येच

कठोर निर्बंधांमध्ये शासनाने परवानगी दिल्यानंतर वाहन चालविले; परंतु प्रवासी बाहेर पडत नसल्याने उत्पन्न मिळाले नाही. खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे वाहन घरीच पार्क करून ठेवले आहे.

- संतोष वाडिले, वाहनचालक

कोरोनामुळे कुणीही बाहेरगावी जात नाही. प्रत्येकजण जीव सांभाळून घरात बसले आहेत. वाहनेदेखील पार्किंगमध्ये लावली आहेत. त्यामुळे काम बंद पडले आहे.

- राहुल पाटील, वाहनचालक

गॅरेजवाल्यांचे पोटपाणी बंद

सुरुवातीचे १५ दिवस गॅरेज बंदच होते. नंतर सकाळी परवानगी मिळाली. आता सुरू केले आहे; परंतु कोरोनामुळे अनेकांची वाहने घरीच पडून असल्याने फारसे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती कधी सुधारेल याची प्रतीक्षा आहे. कारागिरांचे देखील हाल होत आहेत.

- सादिक शेख, गॅरेज मालक

दिवसभरात वाहने दुरुस्त करून मिळालेल्या मजुरीवर कुटुंबांचा गाडा चालतो. सुरुवातीला गॅरेज बंद होते. आता काही तास सुरू असते; परंतु या वेळेत खूपच कमी वाहनांची दुरुस्ती करणे शक्य होते. त्यामुळे तेवढेच पैसे मिळतात. जितकी वाहने दुरुस्त केली तितके जास्त पैसे मिळतात. सध्या वाहनांची संख्या कमी झाल्याने अडचण आहे.

- नईम पिंजारी, कारागीर.