शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२४ कोटींचे पीककर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST

भांडवलाची उपलब्धता व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यासाठी ६८४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ हजार ६२१ ...

भांडवलाची उपलब्धता व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यासाठी ६८४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ हजार ६२१ सभासदांना ३२४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित झाले आहे, तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४४ हजार ८४७ शेतकऱ्यांना ३४० कोटी ८१

लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आदींसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणार्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. ऑगस्टचे पहिले १५ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची चिन्हे आहेत. मात्र शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि

नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व राहील.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या दक्षतेमुळे बेड, ऑक्सिजन, औषधे कमी पडली नाहीत. पोलीस यंत्रणेचे बळकटीकरण केले. त्यांना २२ वाहने उपलब्ध करून दिले. हे सर्व सुरू असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. आतापर्यंत पाच लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, नियमितपणे मास्क वापरावा. असे झाले, तर निश्चितच आपला जिल्हा कोरोना विषाणूमुक्त राहील.

ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती जिल्ह्यात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पांची नियोजित संख्या सात असून त्यापैकी दोन प्रकल्प अस्तित्वात आहेत. त्यांची क्षमता २१ केएल एवढी आहे. उर्वरित पाच प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून त्यांची क्षमता ७८ केएल एवढी आहे. जिल्ह्यात पीएसए प्रकल्पांची संख्या १८ आहे. त्यापैकी पाच प्रकल्प साकार झाले

असून उर्वरित १३ प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही मिळून १५.६३ टन एवढी क्षमता आहे. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.