शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

शौचालय रस्त्यावरील पसरलेल्या घाणीमुळे महिलांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:28 IST

वराहाची दुर्गंधी : काटेरी झुडपांनी वेढले; फरशी झाली निसरडी

मालपूर : हगणदारी मुक्त मालपूर गावात महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त असून वॉर्ड क्र. ३ मधील शौचालयाच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथून चालणे देखील अशक्य असून रस्त्यावरच शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मृत्यूमुखी पडल्याने दुर्गंधी येत असल्यामुळे येथून जाणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे शनि मंदिर परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत दखल घेणे गरजेचे आहे.मालपूर हे हगणदारीमुक्त गाव असून ‘स्वच्छ आणि हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत आहे’ अशा आशयाचे फलक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आले आहे. मात्र येथील महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त आहेत.मालपूर येथील वॉर्ड क्र. ३ मधील शनिमंदिर परिसरातील महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. येथे अमरावती नदीच्या काठावर सार्वजनिक शौचालये असून त्यांची दुर्दशा झालेली आहे. काटेरी झुडपात वेढले गेले असून तेथे जाणेच सध्या अशक्य असल्याचे दिसून येत असून महिलांच्या तक्रारी आहेत.शौचालयात जाणे तर सोडा मात्र शौचालयाजवळ जाणे देखील रस्त्यावरील प्रचंड घाणीच्या साम्राज्यामुळे जिकिरीचे आहे. विठ्ठल मंदिर व सावता महाराज मंदिर दरम्यान समोरील रस्त्यावरुन या शौचालयाकडे जाण्याचा रस्ता असून सध्या या रस्त्यावरुन जाणे अशक्य आहे.या रस्त्यावर दगड फरशी असून गटारी तुडूंब भरल्यामुळे गटारीतील बेसुमार पाणी फरशीवरुन वाहत असते. आजुबाजूला काटेरी झुडपे यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य असून चालणे धोक्याचे झाले आहे. सतत पाणी वाहत असल्यामुळे दगडी फरशी निसरडी झाल्याने पडून गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे तर आज २१ नोव्हेंबर रोजी या शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मरुन पडल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन येथे उभे राहणे देखील मुश्कील असल्याच्या महिलांच्या तक्रारी होत्या. यामुळे येथील महिलांची प्रचंड कुचंबणा होत असून याची त्वरित दखल घ्यावी, अशी तेथील महिलांची मागणी आहे.वॉर्ड क्र. २ मध्ये देखील इंदिरा नगर भागातील जलकुंभ परिसरातील महिला या अमरावती मध्यम प्रकल्पाकडे जाणाºया रस्त्यावर उघड्यावर बसत असल्याचे विदारक चित्र दिसून येत असून महिला शौचालयाच्या समस्यांन ग्रस्त असून याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी येथील महिलांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे