शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जामफळ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:20 IST

सोनगीर : उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा येवू नये यासाठी जामफळ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे़ सुलवाडे-जामफळ-कनोली ...

सोनगीर : उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा येवू नये यासाठी जामफळ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे़सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे काम सोनगीरजवळ प्रगतीपथावर आहे़ गेल्या वर्षी जामफळ धरण ७० टक्के भरले होते़ यंदा आतापर्यंत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात पाण्याचा ओघ सुरूच आहे़ यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा होत आहे़ या पाण्याचा धरण विस्ताराच्या कामात अडथळा येवू नये म्हणून जलसाठा कमी करण्याच्या दृष्टीने बुधवारी दुपारी सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.शिंदखेडा तालुक्याच्या हद्दीतील जामफळ धरणाच्या विस्ताराचे काम सध्या वेगात सुरू आहे़ या धरणाचा विस्तार करून सुलवाडे जामफळ कनोली ही मोठी योजना तयार होत आहे़ या योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून मंजुरी मिळाली. ही योजना चार वर्षांत पूर्ण करणे अपेक्षीत आहे. या योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील दोनशेपेक्षा अधिक गावांच्या शेतजनिमी सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे.जामफळ धरणात मुबलक पाणी साठा असला की परिसरातील शेत विहरींना लाभ होता़ तसेच पंचवीस हजार लोकवस्तीच्या सोनगीर गावाला या धरणातून पाणीपुरवठा होता़ यंदा पावसाने सुरवात जरी समाधानकारक असली तरी आगामी काळात पाऊस टिकून राहील हे सांगता येत नाही़ यामुळे पाण्याचा जास्त प्रमाणात विसर्ग करु नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे