शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

दिव्यांग, बचत गट, महिलांना रेशन दुकानाचे परवाने द्या,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST

धुळे : शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रतीचा धान्य पुरवठा होईल, असे नियोजन पुरवठा विभागाने करावे. धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ...

धुळे : शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रतीचा धान्य पुरवठा होईल, असे नियोजन पुरवठा विभागाने करावे. धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामांची सुरक्षा तपासून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देताना दिव्यांग, महिला बचत गट, महिलांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मंत्री भुजबळ यांनी रविवारी सकाळी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार साहेबराव सोनवणे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या काळात पुरवठा विभागाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राज्यात ५४ हजार स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना धान्य पुरवठा केला जातो. त्यामुळे स्वस्त धान्य दर्जेदार दिले गेले पाहिजे. त्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी. गोदाम स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. गोदामांवर आवश्यक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देताना दिव्यांग, महिला बचत गट, महिलांना प्राधान्य द्यावे. काही शिधापत्रिकाधारक नियमितपणे स्वस्त धान्य दुकानावरील धान्य घेत नाही. अशा शिधापत्रिकांचा शोध घ्यावा. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरजूंना दर्जेदार भोजन देण्यात यावे. त्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेटी देऊन भोजनाची गुणवत्ता तपासावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात ९८१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयच्या ७७ हजार १८१, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची २ लाख १६ हजार २९७, केशरी कार्डधारकांची संख्या १ लाख २९ हजार १७७ एवढी आहे. याशिवाय शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या १७ हजार ३९३ एवढी आहे. धुळे जिल्ह्यात शासकीय गोदामांची संख्या १७ असून पिंपळनेर येथील गोदाम दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. दोंडाईचा येथील गोदामाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. शिवभोजन केंद्रांची संख्या २८ असून दररोज ३,८०० थाळ्यांचे गरजूंना वितरण केले जाते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.