शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

जिव्हाळा तर्फे ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी ...

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी निर्माण व्हावी यासाठी तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथीयांचे हक्क, संरक्षण व कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या राज्य अशासकीय सदस्या वर्षा विद्या विलास यांनी केले.

जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या वतीने धुळे येथील मालेगाव रोड वरील बर्फ कारखान्याच्या मागील परिसरातील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी (काळूबाई) मंदिरातील तृतीयपंथीयांसोबत संपन्न झालेल्या ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ या उपक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिव्हाळा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण समितीचे आमंत्रित सदस्य ॲड. विनोद बोरसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. प्रभा तिरमिरे यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांकडेसुद्धा सामान्य माणसाइतकीच बुद्धिमत्ता, कौशल्य व माणुसकी असते. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रुती क्षीरसागर यांनीदेखील तृतीयपंथीयांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वतीनंदगिरी ऊर्फ पार्वती परशुराम जोगी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संदल जोगी, स्वरा जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, अंकिता जोगी आदी तृतीयपंथी उपस्थित होते.