शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिव्हाळा तर्फे ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी ...

धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी निर्माण व्हावी यासाठी तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथीयांचे हक्क, संरक्षण व कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या राज्य अशासकीय सदस्या वर्षा विद्या विलास यांनी केले.

जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या वतीने धुळे येथील मालेगाव रोड वरील बर्फ कारखान्याच्या मागील परिसरातील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी (काळूबाई) मंदिरातील तृतीयपंथीयांसोबत संपन्न झालेल्या ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ या उपक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिव्हाळा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण समितीचे आमंत्रित सदस्य ॲड. विनोद बोरसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. प्रभा तिरमिरे यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांकडेसुद्धा सामान्य माणसाइतकीच बुद्धिमत्ता, कौशल्य व माणुसकी असते. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रुती क्षीरसागर यांनीदेखील तृतीयपंथीयांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वतीनंदगिरी ऊर्फ पार्वती परशुराम जोगी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संदल जोगी, स्वरा जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, अंकिता जोगी आदी तृतीयपंथी उपस्थित होते.