शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धुळेकरांना पडला कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर ...

लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आतापर्यंत १९३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ तर ३९५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे़ शहरात कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे़ तरीही नागरिकांना शिस्त लागत नसल्याचे दिसून येत आहे़

शहरात वाहतुकीला बंदी घालण्याची गरज

व्यावसायिकांना सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची सहसा सकाळी ११ ते सांयकाळी ५ पर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाने जुन्या आग्रारोडवर किमान तात्पुरती व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे आग्रारोडवर रिक्षा, चारचाकी व अवजड वाहनांना काही दिवसांसाठीतरी बंदी करणे आवश्यक आहे़ बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने रस्ता अडवितात़ त्यामुळे बाजारात खेरदीसाठी आलेल्या नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होते़ त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही़

आग्रा रोडलगत असलेल्या बोळींमध्ये, महापालिकेच्या आवारात तसेच मनपा शाळा क्रमांक पाच, जिल्हा बँकेच्या मागील बाजूच्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मनपाने पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे़

शुक्रवारी बाजारात गर्दी

लाॅकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागरिकांनी खरेदीसाठी जुना आग्रा रोड, पाच कंदील, पारोळारोड, कराचीवाला खुंट अशा परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़ याचवेळी महाराणा प्रताप चौक ते फुलवाला चौक परिसरात गर्दीत चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. खरेदीसाठी आलेले अनेकजण विनामास्क बिनधास्त फिरताना आढळून आले़. महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. आग्रारोडवरील दुकानांसमोर लागलेली दुचाकी वाहने, विक्रेत्यांनी लावलेल्या हातगाड्या, लोखंडी जाळ्या, भररस्त्यात लावण्यात आलेल्या रिक्षा व चारचाकी वाहने, दुकानांचे फलक, कमानी यामुळे पार्किंगचा प्रश्न बिकट होऊन बसला आहे़

डिस्टन्स ठेवण्याची गरज

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क व किमान अंतर ठेवण्याची गरज आहे़ मात्र, बहुसंख्य व्यक्ती आजही रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

२२०० कोरोना मुक्त

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.