शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांवरच भिस्त राहणार अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:03 IST

सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र परिश्रमाची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपबरोबरच महाविकास आघाडीलाही त्याच तोडीचे तुल्यबळ उमेदवार द्यावे लागतील. तरच त्यांचे सत्ता स्थापण्याचे स्वप्न साकारू शकेल, अशी चर्चा आहे.भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांतर्फे नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडलेला आहे. संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झालेली असल्याची चर्चा आहे. त्यात कोणा-कोणाला संधी मिळते याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपसह महाविकास आघाडी त्याचबरोबर विविध लहान-लहान पक्षही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवाय अपक्षांची भाऊ गर्दीही मोठ्या प्रमाणावर असेल. या सर्वांमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्षाला गट व गणात तुल्यबळ उमेदवार द्यावे लागणार आहे.ेगेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल भाजपला जागा मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी हे तीनही पक्ष एकत्र येत त्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधलेली आहे. तर भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. असे असले तरी दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने, त्यांना त्यानुसारच उमेदवार द्यावे लागतील.पक्ष कितीही मोठा असला तरी स्थानिक उमेदवाराचा संपर्क, त्याने आतापर्यंत केलेली समाजपयोगी कामे याचा विचार करूनच अनेकजण मतदान करीत असतात, हे वास्तव आहे. भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने, या निवडणुकीत भाजपला सर्वच गट व गणांमध्ये तुल्यबळ उमेदवारच द्यावे लागतील. तरच सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होवू शकणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे