शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेत ५० कर्मचा-यांवर गंडांतराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:08 IST

जि.प. : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही; प्रशासनाने मागविली होती माहिती

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत आहे. त्यातच आता शासनाने जर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांवर कारवाई केली तर मोठी अडचण होणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई झाली तर रिक्त जागांची संख्या आणखी वाढणार आहे. परिणामी कामाचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासकीय सेवेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून दाखल झालेले मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे कर्मचाºयांची सेवा समाप्तीचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले होते.  या आदेशानुसार जिल्हा परिषदेत किमान ५० कर्मचाºयांवर टांगती तलावार राहणार आहे.  या कर्मचाºयांबाबत काय करावे? यासंदर्भात अद्याप शासनाने भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी जिल्हा परिषदस्तरावर अशा कर्मचाºयांची माहिती मागविण्यात आली असून त्यात ५० कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर बिगर आदिवासींनी  नोकºया स्वीकारल्याचे आरोप होत असतात. यापूर्वी २०१३   मध्ये शासकीय सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाºयांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार कर्मचाºयांनी  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्तावदेखील दाखल केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप निकाली निघालेले नाहीत. दरम्यान, दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत. जि.प.त १२२ कर्मचा-यांनीच सादर केले प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत १९९५ ते २०१५ या कालावधीपर्यंत १ हजार १५९ अनुसूचित  जाती प्रवर्गाचे कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक हजार १२२ कर्मचाºयांनी ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले आहेत. तर ५० कर्मचाºयांनी जातवैधता समितीकडे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. त्यांचे  प्रस्ताव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित  आहेत. दरम्यान दुसरीकडे शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाºयांकडून माहिती संकलित सुरू केली आहे. एकंदरीत जातवैधता प्रमाणपत्र सादर  करू न  शकलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांच्या  नोकरीवर गंडातराची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट आदेश येत नाहीत. तोपर्यंत कोणतीच कार्यवाही होणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.