शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

धुळे जिल्हा परिषदेत ५० कर्मचा-यांवर गंडांतराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:08 IST

जि.प. : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही; प्रशासनाने मागविली होती माहिती

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत आहे. त्यातच आता शासनाने जर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांवर कारवाई केली तर मोठी अडचण होणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई झाली तर रिक्त जागांची संख्या आणखी वाढणार आहे. परिणामी कामाचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासकीय सेवेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून दाखल झालेले मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे कर्मचाºयांची सेवा समाप्तीचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले होते.  या आदेशानुसार जिल्हा परिषदेत किमान ५० कर्मचाºयांवर टांगती तलावार राहणार आहे.  या कर्मचाºयांबाबत काय करावे? यासंदर्भात अद्याप शासनाने भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी जिल्हा परिषदस्तरावर अशा कर्मचाºयांची माहिती मागविण्यात आली असून त्यात ५० कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर बिगर आदिवासींनी  नोकºया स्वीकारल्याचे आरोप होत असतात. यापूर्वी २०१३   मध्ये शासकीय सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाºयांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार कर्मचाºयांनी  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्तावदेखील दाखल केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव अद्याप निकाली निघालेले नाहीत. दरम्यान, दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत. जि.प.त १२२ कर्मचा-यांनीच सादर केले प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत १९९५ ते २०१५ या कालावधीपर्यंत १ हजार १५९ अनुसूचित  जाती प्रवर्गाचे कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक हजार १२२ कर्मचाºयांनी ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले आहेत. तर ५० कर्मचाºयांनी जातवैधता समितीकडे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. त्यांचे  प्रस्ताव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित  आहेत. दरम्यान दुसरीकडे शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाºयांकडून माहिती संकलित सुरू केली आहे. एकंदरीत जातवैधता प्रमाणपत्र सादर  करू न  शकलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाºयांच्या  नोकरीवर गंडातराची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट आदेश येत नाहीत. तोपर्यंत कोणतीच कार्यवाही होणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.