शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

धुळे - दोन गटात हाणामारी, ४० जणांवर दंगलीचा गुन्हा

By admin | Updated: October 8, 2016 21:18 IST

जनावरे भरलेल्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 8 - जनावरे भरलेल्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून संशयितांवर ३ वेगवेगळे दंगलीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस़ हे येथील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या घटनेतील सागर पाटील व जितेंद्र पाटील या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत सर्व आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी येथील पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. 
कट मारल्याचा जाब़़
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सागर रामराव सोनवणे हा दिनेश बारी व विकास बारी या मित्रांसमवेत शहरातील आऱसी़पटेल मेन बिल्डींगजवळील डॉ़श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर पाणीपुरी खात होता. त्यावेळी एका अ‍ॅपेरिक्षाने कट मारून पळ काढला़ अंधार असल्यामुळे गाडीचा नंबर दिसला नाही. तिचा पाठलाग केला असता ती गाडी मार्केट कमिटी आवारात दिसली़ 
सदर चालक रईस गुलाब खाटीक रा़वरवाडे यास त्यांनी कट मारल्याचा जाब विचारला असता त्याच्यासह इतर त्याच्या सोबत असलेले अरूण थोरात, विशाल थोरात, सुनिल हिरालाल वानखेडे, मनोज शिरसाठ, आकाश शिरसाठ, अजय पाटोळे, बाबा पाटोळे, संदेश थोरात, सतिष मोरे, पिंटू खैरणार, पंकज बाविस्कर, विक्की शिरसाठ असे एकूण १३ (सर्व राहणार बौध्दवाडा शिरपूर) जणांनी गर्दी जमवून हातात लाठ्या-काठ्या घेवून मारहाण केली़ तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ 
सागर सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात संशयित १३ जणांविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दोन दिवसांची पोलीस कोठडी
या घटनेनंतर पोसिलानंी सागर पाटील व सुनील पाटील यांना अटक केली असून शनिवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
१२ गाड्यांचे नुकसान
सतिष मनोहर मोरे रा़वरचे गांव आंबेडकर चौक याने दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ मोरे हे गाडी क्रमांक एम़एच़२०-सीटी ६६४४ लावून मार्केट आवारात उभे होते़ अचानक सागर पाटील, दीपक पाटील उर्फ भावश्या, सागर दगडू पाटील, जितेंद्र सुनिल पाटील, आनंद उर्फ वावड्या पाटील, मनोज माळी, संभा पाटील, मुन्ना माळी, भैय्या माळी, पंकज मराठे, भूषण उर्फ भटू पाटील, तुषार बारी, हरीष भोई, सचिन नाना शिरसाठ असे १४ जणांनी गर्दी गोळा करून हातातील लाकडी दांडके व दगडाने वाहनांमध्ये जनावरे घेवून जातात म्हणून तोडफोड केली़
त्यात गाडी क्रमांक एम़एच़२०-सीटी ६६४४, एम़एच़१४-सीपी-९७, एम़एच़३९-सी-६३७३, एम़एच़१८-एए-३०१०, एम़एच़०४-डीके-४९३८, एम़एच़१८-एए-४३२१, एम़एच़१८-एए-४०४३, एम़एच़१८-एए-७७४९, एम़एच़१८-एए-९३३१, एम़एच़१८-एए-६७८६, एम़एच़१८-एए-८३४९, एम़एच़१९-एस-७५४६, एम़एच़१८-एए-७६४४ या क्रमांकाच्या १२ वाहनांचे काच, ताडपत्री तोडून ४० ते ४५ हजार रूपयांचे नुकसान केले़ याबाबत सतिष मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६, मु़पोक़ाक़लम ३ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेचे वृत्त कळल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ यांनी येथील पोलीस ठाण्यास भेट देवून संशयित आरोपींना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या़ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सांगवीचे रविंद्र देशमुख, थाळनेर पोलीस ठाण्याचे तलवारे यांनी परिस्थिती हाताळली़