शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

धुळे मनपा निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:29 IST

 १० गावांमधून वाढणार मतदार संख्या, राजकीय समीकरणे बदलणार

ठळक मुद्दे पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते.  हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू झाली.

निखिल कुलकर्णी। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढीमुळे धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर पडणार आहे़ नगाव वगळता हद्दवाढीतील १० गावांमधून हे मतदार वाढणार असून त्यामुळे ५ नगरसेवक वाढतील़शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू झाली. त्यामुळे ११ गावांचा धुळे महापालिका क्षेत्रात समावेश झाला आहे़ पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते. त्यात हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ झाली आहे़ त्यामुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौ.कि.मी. झाले आहे़  त्यामुळे शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे़ शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील एकूण ३९ हजार ९० मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत़ नगाव वगळता उर्वरित १० गावांमधील मतदारांना प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे़ त्यात सर्वाधिक मतदार संख्या १७ हजार ३२७ वलवाड, तर सर्वात कमी ८४५ मतदार अवधान गावातून वाढणार आहेत़ मतदानाचा हक्क १८ वर्षे वयाची अट पूर्ण केल्यानंतर मिळत असल्याने त्याखालील लोकसंख्या लक्षात घेतल्यास संबंधित गावांची प्रत्यक्ष लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा अधिक असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संख्येवरच सर्वाधिक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत़ वाढीव मतदार संख्येचा फायदा केवळ मनपा निवडणुकीत होईल़शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार२०११ च्या जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार ५५९ इतकी आहे़ त्यात १ लाख ९३ हजार ४४६ पुरुष व १ लाख ८२ हजार ११३ स्त्रियांचा समावेश आहे़शहर हद्दवाढीतील गावांमधील मतदार धुळे मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार असले तरी ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मतदान करू शकणार नाही़ त्यांचा विधानसभा मतदारसंघच धुळे ग्रामीण असेल़ नगाव गावातील गावठाण भाग मनपा क्षेत्रात सहभागी झाला असल्याने या गावाचे नागरिक मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार नाही़वाढीव क्षेत्रात सुविधा देण्याचे आव्हानशहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांमधील मतदार मनपा निवडणुकीत मतदान करणार असल्याने येत्या काळात संबंधित गावांमध्येदेखील सोयी-सुविधा पुरविण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना करावे लागणार आहे़ हद्दवाढीमुळे नगरसेवकांची संख्या ५ ने वाढण्याची शक्यता असली तरी त्याबाबतची स्पष्टता प्रभाग रचनेनंतरच होणार आहे़