शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेतर्फे सात दिवसांत १ कोटींची करवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:33 IST

शास्तीमाफी योजनेत ७ लाख रूपये शास्ती वसुल, कर भरण्यासाठी रांगा

ठळक मुद्देशहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये देखील मनपाकडून करवसुली सुरू करण्यात आली आहे़ मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी उन्हात रांगा लावून उभे राहावे लागत असल्याने बँक काऊंटर वाढविणे आवश्यक आहे़ सहामाही कर आकारणीबाबत माहिती नसल्याने नागरिक गोंधळत आहेत़

धुळे : महापालिकेने यंदा सलग तिसºया वर्षी मालमत्ताधारकांना शास्तीमाफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे़ त्यानुसार शास्तीमाफी जाहीर झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत तब्बल १ कोटी रूपयांची करवसुली झाली असून त्यात ७ लाखांच्या शास्तीचा समावेश आहे़महापालिकेने शास्तीमाफी अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना ५ ते २३ फेब्रुवारी शास्तीत ५० टक्के तर २६ फेब्रुवारी ते ९ मार्च २५ टक्के सवलत जाहीर केली आहे़ शास्तीमाफी योजनेमुळे मनपात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांच्या रांगा लागत आहे़पहिला आठवडा लाभदायीशास्तीमाफी योजना लागू झाल्यापासून अर्थात ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मनपाने एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांची करवसुली केली आहे़ त्यात २३ लाख ५० हजार १०५ रूपये मागील थकबाकी वसुल झाली असून ३८ लाख ७७ हजार ९४५ रूपये चालू कर वसुल झाला आहे़ रोखीचा भरणा एकूण ६२ लाख २८ हजार ५० रूपये असून धनादेशाव्दारे ४३ लाख ६७ हजार ५८ रूपये कराचा भरणा झाला आहे़ सर्व मिळून एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार १०८ रूपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे़ त्यामुळे शास्तीमाफीनंतर पहिलाच आठवडा मनपाला लाभदायी ठरला आहे़ मालमत्ता लिलावासाठी घेणार स्थायीची मान्यतामहापालिकेने मागील व चालू वर्षी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी मालमत्ताधारकांना नियमानुसार नोटीस देऊन मालमत्ता सील केल्यापासून २१ दिवसांची मुदत कर भरण्यासाठी दिली जाणार आहे़ तोपर्यंत मनपाकडून मालमत्तांचे मुल्यांकन करून त्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता घेतली जाणार आहे़ ज्या मालमत्तांना जाहीर लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळणार नाही, त्या नाममात्र शुल्क आकारून मनपाच्या नावाने केल्या जातील़ करवसुलीसाठी ३९ पथकेआयुक्तांच्या आदेशानुसार कर वसुली करण्यासाठी तब्बल ३९ पथके नेमण्यात आली आहेत़ मात्र त्यापैकी बहूतांश पथकाचे सदस्य मनपातच बसून असल्याचे दिसून येते़ त्यामुळे बरीच पथके कागदावरच कार्यरत आहेत़ त्यामुळे धडक कारवाईसाठी पथके नेमून देखील कोणतीही मोठी कारवाई आतापर्यंत झालेली नाही़