शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

धुळे आगारातून पुण्यासाठी १८ तर नाशिकसाठी ५० जादा बसेस सोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 21:21 IST

दिवसभरात १८ ते २० हजार नागरिकांनी केला प्रवास

आॅनलाइन लोकमतधुळे : सोमवारपासून सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये नियमित सुरू होणार असल्याने, रविवारी पुणे, नाशिक, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची धुळे मध्यवर्ती बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. धुळे आगारातून पुण्यासाठी रात्री ८ ते १० यावेळेत तब्बल १८ जादा तर नाशिकसाठी दिवसभरात ५० गाड्या सोडण्यात आल्या होत्या. दिवसभरात १८ ते २० हजार नागरिकांनी प्रवास केल्याची माहिती धुळे आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांनी दिली.यावर्षी दिवाळीत पाऊस असला तरी नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नागरिक दिवाळीच्या सणासाठी गावी आले होते. भाऊबीज सण आटोपल्यानंतर मंगळवारीच अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. असे असले तरी बहुतांशजण रविवारपर्यंत गावी थांबून होते.सोमवारपासून सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये पूर्ववत सुरू होणार आहेत. कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे असल्याने, अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे रविवारी धुळे बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली होती. स्थानकात पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे आगारातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.रविवारी दिवसभरात नाशिकसाठी तब्बल ५० बसेस सोडण्यात आल्या. तर पुण्याला जाणाºया प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, रात्री ८ ते १० यावेळेत नियमित गाड्यां व्यतिरिक्त तब्बल १८ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी झालेली होती.दरम्यान रविवारी दिवभरात तब्बल १८ ते २० हजार प्रवाशांनी धुळ्यातून प्रवास केल्याची माहिती आगार प्रमुख जगनोर यांनी दिली.इतर आगारांच्या गाड्यांही गर्दीदरम्यान चोपडा, अमळनेर, शिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा या आगाराच्या नाशिक, पुण्याला जाणाºया धुळे मार्गेच जात होत्या. या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी झालेली होती.

टॅग्स :Dhuleधुळे