शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

धुळे जि़प़, पं़स़ निवडणुकीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:56 IST

औरंगाबाद खंडपिठ : आरक्षण सोडतसह गट-गणाच्या रचनेत भेदभाव केल्याचा आरोप

ठळक मुद्देजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला औरंगाबाद खंडपिठाने तात्पुरती स्थगितीखंडपिठाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हाभरात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला औरंगाबाद खंडपिठाने तात्पुरती स्थगिती दिली असून  यावर शासनाला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले  आहे. याचिकेवर पुढील कामकाज  ११ सप्टेबरला ठेवण्यात आले आहे.  यासंदर्भात माजी जि.प.सदस्य प्रभाकर भदाणे यांनी खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यांच्यातर्फे  अ‍ॅड़ पी़ एम़ शहा यांनी खंडपिठात बाजू मांडली़ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची आरक्षणाची मर्यादा कायद्याच्या निर्देशानुसार  ठरलेली असताना प्रशासनाने त्या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण काढले. तसेच गट - गणाची रचना करताना कायद्याप्रमाणे करण्यात आले नसल्याचा आक्षेप घेत  या सर्व प्रक्रियेवर हरकत घेणारी   याचिका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे आणि प्रकाश भदाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात   दाखल केली होती़ याचिकेत गट आणि गणाची रचना चुकलेली आहे़ लोकसंख्येचा निकष पाळला गेलेला नाही़ या प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग झालेला आहे़ यासह विविध मुद्यांची मांडणी करत याचिकाकर्त्यांनी गट आणि गणाची नव्याने रचना व्हावी, नव्याने आरक्षण काढण्यात यावे त्यासाठी   निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रारुप गट आणि गण रचना आरक्षण जाहीर होण्यापुर्वी जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे काही जणांनी वेगवेगळ्या पध्दतीने हरकत दाखल केल्या होत्या. त्यात गट, गणांची रचना जाहीर होण्यापुर्वी लिक होणे, यात लोकसंख्येच्या मर्यादेचा निकष न पाळणे, एखादा गट तयार करताना प्रथम नाव तयार करायचे, आरक्षण ठरवायचे, नंतर गावे जोडायची असा काहीसा प्रकार घडल्याची गंभीर तक्रार करण्यात आली होती़ परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन जिल्हा प्रशासनाने गट व गणाची रचना जाहीर करुन   आरक्षण सोडत काढली.यासंदर्भात याचिककर्त्याने न्यायालयात जाण्याआधी जिल्हा प्रशासनाकडे ही हरकत दाखल केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा शेवटी याचिकाकर्ता याने खंडपिठाकडे धाव घेतली.याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात न्यायमुर्ती आऱ बोर्डे आणि अविनाश पाटील यांच्यापुढे चालली. त्यात   वरील निर्णय जाहीर करण्यात आला.   त्यानुसार, आरक्षण हे ५० टक्के पेक्षा जास्त नसावे असे असताना मात्र हे ७१ टक्यांपर्यंत पोहचल्याचे दिसते. तसेच गट - गणाची रचना करताना त्यातही भेदभाव झाला आहे. रचना चक्राकार पध्दतीने अर्थात कायद्याप्रमाणे होणे अपेक्षित असताना तसे झाले नसल्याचे समोर आल्याचे म्हटले आहे.खंडपिठाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  आता गट व गणाचे आरक्षण आणि रचनाही बदलले की कसे हाईल, याबाबत जिल्ह्याभरात चर्चा सुरु आहे.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक