शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

धुळे कृउबात व्यवहार सुरळीत; आवक कमी

By admin | Updated: June 6, 2017 12:28 IST

शहरातील दुकाने सुरू : भाजीपाल्यांच्या जादा दरामुळे ग्राहक त्रस्त

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.6 : धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुरळीत व्यवहार सुरू होते. परंतु, शेतमालाची आवक खूपच कमी असल्यामुळे येथील बाजारात उपलब्ध असलेला माल जादा किंमतीने विकला जात होता. परिणामी, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. 
भूईमूग शेंगा व कांद्याची आवक कमी 
मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भूईमूग शेंगाची आवक केवळ 15 क्विंटल तर कांद्याची आवक 400 क्विटंल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव डी. सी. सिसोदीया यांनी दिली. ते म्हणाले, की येथील बाजार समितीत भूईमूग शेंगाची सरासरी 500 क्विंटल तर कांद्याची 4 ते 5 हजार रुपये क्विंटल आवक होत असते. परंतु, शेतकरी संपामुळे सलग सहाव्या दिवशी बाजारात कमी आवक झाल्याची माहिती त्यांनी दिली. 
गुरांचा बाजार भरला; पण प्रतिसाद नाही 
धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी नियमित गुरांचा बाजार भरला होता. ग्रामीण भागातून काही मोजक्याच शेतक:यांनी गुरे विक्रीसाठी आणली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. 
350 क्विंटल भाजीपाल्याची आवक 
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात केवळ 350 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शेतक:यांची भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. गेल्या पाच दिवसांपासून केवळ सरकारी 250 ते 300 क्विंटल भाजीपाल्याची आवक होत होती. परंतु, आज भाजीपाल्याची आवक ब:यापैकी झाल्यामुळे दुपारी बारा वाजेर्पयत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. 
कांदा मार्केटमध्ये शांतता 
साक्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत  पिंपळनेर, जैताणे, दहिवेल येथे कांदा मार्केट आजपासून पूर्ववत सुरू झाले. त्यापाश्र्वभूमीवर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतक:यांना कांदा विक्रीसाठी आणावा, याउद्देशाने आवाहन करण्यात आले होते. परंतु, शेतकरी संपामुळे कांदा उत्पादक शेतक:यांनी आज दिवसभरात कांदा विक्रीसाठी न नेल्यामुळे येथील बाजारात शुकशुकाट दिसून आला. परिणामी, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती साक्री कृउबातर्फे देण्यात आली. 
शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात सुरळीत व्यवहार 
मंगळवारी शिंदखेडा व शिरपूर शहरातील बाजारपेठेत सुरळीत व्यवहार सुरू होता. या दोन्ही शहरातील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खरेदीदारांची लगबग दिसून आली. या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठाही पूर्ववत सुरू होत्या.