शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

धुळे जिल्ह्यात कांद्याला भाव नसल्याने साठवणुकीकडे कल

By admin | Updated: April 23, 2017 18:16 IST

कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने अनेक शेतक:यांनी कांदा चाळीत साठवल्याचे चित्र आहे

ऑनलाइन लोकमतपिंपळनेर, जि. धुळे, दि. 23 -  साक्री तालुक्यातील विविध भागात सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतक:यांना  शेतातून काढलेल्या कांद्याला योग्य हमीभाव  मिळत नसल्याने अनेक शेतक:यांनी कांदा  चाळीत साठवल्याचे चित्र  आहे. दरम्यान, कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी 2 मेपासून तालुक्यातील विविध भागात कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च निघणे अवघड मोठय़ा कष्टाने शेतक:यांनी रात्रं-दिवस मिळेल, तसे पाणी देऊन कांद्याचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र शेतक:यांना कांद्याचे उत्पादन चांगले आले आहेत. कांदा लावणीपासून ते कांदा चाळीत भरेर्पयत मोठय़ा प्रमाणात खर्चाला शेतक:यांना सामारे जावे लागते. मात्र गेल्या तीन वर्षापासून कांद्याचे भाव  उतरल्याने शेतक:यांना खर्च निघणे अवघड झाले आहे. एकरी 45 हजार रुपये र्पयत खर्च व मजुरी शेतक:यांना द्यावी लागत आहे. त्यातुलनेत कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. कांदा विक्रीसाठी येताहेत 170 वाहने  पिंपळनेरसह परिसरात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. यातूनच कांद्याचे उत्पादन घेतले गेले. परिणामी, येथील उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी  दररोज 150 ते 170 वाहने कांदा विक्रीसाठी आणले जात आहे. परंतु, भावच नसल्याने येथे आणलेली वाहने शेतक:यांना पुन्हा परत न्यावी लागत आहे. भाविष्यात कांद्याला चांगले भाव मिळतील, या हेतूने शेतकरी कांदा चाळीत साठवताना दिसत आहेत. निजामपूर, जैताणे व दहिवेल येथे मार्केट दरम्यान, कांद्याला योग्य हमी पिंपळनेर येथील उपबाजार समितीत मिळत नसताना शेतक:यांना दिलासा देण्यासाठी साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने निजामपूर, जैताणे व दहिवेल येथे 2 मे पासून कांदा मार्केट सुरू होणार असून या मार्केटमध्ये शेतक:यांना अपेक्षित असलेला भाव मिळू शकतो, अशी आशा शेतक:यांमधून व्यक्त केली जात आहे.यंदाही कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतक:यांच्या या समस्येवर लक्ष द्यावे, अशी मागणी संजय भदाणे, अमोल गांगुर्डे, किरण कोठावदे या कांदा उत्पादक तसेच व्यापा:यांनी केली आहे.