शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

धुळे जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:46 IST

१ नोव्हेंबरपर्यंत फक्त १९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त, गती वाढविण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाईसाठी पीक विमा अर्ज भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. १ नोव्हेंबरपर्यंत ७६ हजार ८०२ पैकी १ हजार ९२१ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कृषी उपसंचालक एस.डी. मालपुरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिली आहे.जिल्ह्यात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. त्यात कपाशीची २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान शासनाच्या निर्देशानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे सुरू केलेले आहेत.जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत ७६ हजार ८०२ शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.मात्र स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनी किंवा संंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, व बॅँकेस विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकºयांना करण्यात आले होते. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच विमा कंपनी पंचनामे करून नुकसान भरपाई देत असते.१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील फक्त १ हजार ९२१ शेतकºयांचे अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले होते. अपेक्षेनुसार किमान आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होणे गरजेचे होते.पीक विम्यासाठी अर्ज भरून घेण्याचे प्रमाण अतिशय धीम्यागतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान अर्ज भरण्याच्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली.

टॅग्स :Dhuleधुळे