शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोरोना रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:25 IST

प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे : नियमांचे पालन करावे, नागरिकांनी घाबरून जावू नये

धुळे - धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला आहे. असे असले, तरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांनी कोरोना विषाणूविषयक नियमांचे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे.धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार २६९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार २७७ रुग्ण बरे होवून घरी परतले असून ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ५९७ रुग्ण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, एसीपीएम डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, महानगरपालिकेचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटर्ससह ३५ खाटा, आॅक्सिजनयुक्त १००, तर सर्वसाधारण ३५० खाटा उपलब्ध आहेत. सध्या २०८ रुग्ण उपचार घेत असून आॅक्सिजनचा टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. याशिवाय एसीपीएम रुग्णालयात १००, जिल्हा रुग्णालयात ६०, महानगरपालिकेचे जिल्हा रुग्णालयात ६०, उपजिल्हा रुग्ण्णालय, शिरपूर येथे ८०, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे ४०, साक्री येथे ३० खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश खाटा या आॅक्सिजनच्या सुविधेसह आहेत. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे १८०० खाटा उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या औषधोपचारसाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. ९१ टक्के आरोग्य कर्मचा?्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून फ्रंट लाइनवरील ६३ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासकीय, महानगरपालिकेसह खासगी रुग्णालये मिळून ५६ आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून रोज सरासरी साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सहकायार्ची आवश्यकता आहे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. असे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी सांगितले़जिल्हाधिकारी म्हणतात- प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे- हात सॅनेटायझर अथवा साबणाने वेळोवेळी स्वच्छ करावेत- तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित- गृहविलगीकरणातील व्यक्तींवर आरोग्य विभागाचे लक्ष- विवाह सोहळ्यांसाठी फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा- विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची पूर्व परवानगी आवश्यक- ग्रामसेवक, तलाठी, पोलिस विभागावर जबाबदारी- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार- नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये- धुळे जिल्ह्यात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश- अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे