शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींचा धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:50 IST

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़

ठळक मुद्देधुळे शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारतीस्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्ष

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़ धुळे शहरातदेखील आजच्या स्थितीत तब्बल १०५ धोकादायक इमारती असूनही मनपाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे भविष्यात धुळ्यातही अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ शहरात अनेक इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात समोर आले आहे़नोटिसांची ‘औपचारिकता’शहरातील जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालीन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ धोकादायक इमारतींना मनपाने दरवर्षी मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४(१) नुसार नोटिसा बजावणे क्रमप्राप्त असल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़स्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्षसदर नोटीस मिळाल्यावर संबंधित इमारत मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून ते महापालिकेला सादर करायला हवे़ मात्र एकाही इमारत मालकाने इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल महापालिकेला सादर केलेला नाही़ उलट धोकादायक इमारत असल्यास त्यावर पावसाळ्यात प्लॅस्टिकचे कागद टाकून व इमारत धोकादायक असल्याचा फलक लावून इमारतीचे मालक स्वत: मुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात़संभाव्य वादांमुळे टाळाटाळबहुतांश धोकादायक इमारती या कधीही कोसळण्याची शक्यता आहे़ मात्र असे असतानाही त्यामध्ये नागरिक रहिवास करतात़ त्यामुळे इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते़ इमारतीवर कारवाईपूर्वी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने संभाव्य वाद लक्षात घेऊन मनपा प्रशासन त्याकडे डोळेझाक करते़ त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते इमारत सोडण्यास तयार नसतात, तर बहुतांश इमारतींचे वादविवाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिका प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाही़ मुंबईत घडलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर ठोस आवश्यक आहे़ जेणेकरून संभाव्य दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतील़महापालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़ मात्र नागरिकांनीही या इमारतींवरील कार्यवाहीसाठी सहकार्य करायला हवे़ धोकादायक इमारतींबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल़-रवींद्र जाधव,उपायुक्त, मनपा, धुळे