शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

धोकादायक इमारतींचा धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:50 IST

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़

ठळक मुद्देधुळे शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारतीस्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्ष

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़ धुळे शहरातदेखील आजच्या स्थितीत तब्बल १०५ धोकादायक इमारती असूनही मनपाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे भविष्यात धुळ्यातही अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ शहरात अनेक इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात समोर आले आहे़नोटिसांची ‘औपचारिकता’शहरातील जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालीन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ धोकादायक इमारतींना मनपाने दरवर्षी मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४(१) नुसार नोटिसा बजावणे क्रमप्राप्त असल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़स्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्षसदर नोटीस मिळाल्यावर संबंधित इमारत मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून ते महापालिकेला सादर करायला हवे़ मात्र एकाही इमारत मालकाने इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल महापालिकेला सादर केलेला नाही़ उलट धोकादायक इमारत असल्यास त्यावर पावसाळ्यात प्लॅस्टिकचे कागद टाकून व इमारत धोकादायक असल्याचा फलक लावून इमारतीचे मालक स्वत: मुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात़संभाव्य वादांमुळे टाळाटाळबहुतांश धोकादायक इमारती या कधीही कोसळण्याची शक्यता आहे़ मात्र असे असतानाही त्यामध्ये नागरिक रहिवास करतात़ त्यामुळे इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते़ इमारतीवर कारवाईपूर्वी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने संभाव्य वाद लक्षात घेऊन मनपा प्रशासन त्याकडे डोळेझाक करते़ त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते इमारत सोडण्यास तयार नसतात, तर बहुतांश इमारतींचे वादविवाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिका प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाही़ मुंबईत घडलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर ठोस आवश्यक आहे़ जेणेकरून संभाव्य दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतील़महापालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़ मात्र नागरिकांनीही या इमारतींवरील कार्यवाहीसाठी सहकार्य करायला हवे़ धोकादायक इमारतींबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल़-रवींद्र जाधव,उपायुक्त, मनपा, धुळे