शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जमिनीचा योग्य मोबदल्यासाठी धुळ्यात शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:06 IST

बैठक घेऊन निर्णय घेऊ : उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

ठळक मुद्देजमिनीस योग्य मोबदला देण्याची मागणी करत शेतकºयांचे धरणेरोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनास पाठिंंबा महिन्याच्या आत बैठक घेऊन निर्णय घेण्याच उद्योगमंत्र्यांचे आश्वासन 

 लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील अतिरिक्त नरडाणा औद्योगिक क्षेत्रासाठी टप्पा क्र.तीन अंतर्गत अधिग्रहित शेतजमिनील योेग्य मोबदला द्या किंवा सातबाºयावर एमआयडीसे मारलेले शिक्के उठवा अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या अशी मागणी करत तेथील शेतकºयांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रश्नी शेतकºयांच्या भावना तीव्र असून रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्यांनीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी याबाबत बोलणे केले. यावर एक महिन्याच्या आत बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त  चांगला भाव देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.या आंदोलनात माजी आमदार प्रा.शरद पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, मेलाणे, माळीच, जतोडा आदी गावांमधील शेतकरी बहुसंख्येने  सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांनी धरणे दिले. यावेळी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. मात्र योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. ८ वर्षांपासून त्यांच्या जमिनीच्या सातबाºयावर एमआयडीसीचे शिक्के मारल्याने त्यांना त्यांची विक्री करता येत नाही, बागायती करायची म्हटली तर बॅँकेचे कर्ज मिळत नाही. सरकार योग्य मोबदला देत नसल्याने प्रकल्पबाधित शेतकरी पूर्णपणे हैराण झाले असून त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी या प्रश्नी चार बैठका झाल्या असून पालकमंत्र्यांना शिंदखेडा दौºयावेळी निवेदने दिली आहेत. मात्र अद्यात त्यातून काहीही मार्ग निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी त्रस्त झाले असून जमिनीला योग्य मोबदला द्या अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यासाठी इच्छामरणास परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मंत्री रावल यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केले. शेतकºयांच्या भावना याप्रश्नी तीव्र असून त्वरित मार्ग काढावा अशी त्यांची अपेक्षा असल्याचे देसाई यांना सांगितले. त्यावर लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रश्नी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मंत्री रावल यांनी या बैठकीची जबाबदारी घेत असल्याचे सांगून लवकरात लवकर बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त भाव देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. या आंदोलनात कैलास पाटील, प्रमोद सिसोदे, संजीवनी सिसोदे, भाजयुमोचे राम भदाणे, राजेंद्र पाटील, सत्यजित सिसोदे, कमलेश भामरे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.