शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा योग्य मोबदल्यासाठी धुळ्यात शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:06 IST

बैठक घेऊन निर्णय घेऊ : उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

ठळक मुद्देजमिनीस योग्य मोबदला देण्याची मागणी करत शेतकºयांचे धरणेरोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनास पाठिंंबा महिन्याच्या आत बैठक घेऊन निर्णय घेण्याच उद्योगमंत्र्यांचे आश्वासन 

 लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील अतिरिक्त नरडाणा औद्योगिक क्षेत्रासाठी टप्पा क्र.तीन अंतर्गत अधिग्रहित शेतजमिनील योेग्य मोबदला द्या किंवा सातबाºयावर एमआयडीसे मारलेले शिक्के उठवा अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या अशी मागणी करत तेथील शेतकºयांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रश्नी शेतकºयांच्या भावना तीव्र असून रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्यांनीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी याबाबत बोलणे केले. यावर एक महिन्याच्या आत बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त  चांगला भाव देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.या आंदोलनात माजी आमदार प्रा.शरद पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, मेलाणे, माळीच, जतोडा आदी गावांमधील शेतकरी बहुसंख्येने  सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांनी धरणे दिले. यावेळी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. मात्र योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. ८ वर्षांपासून त्यांच्या जमिनीच्या सातबाºयावर एमआयडीसीचे शिक्के मारल्याने त्यांना त्यांची विक्री करता येत नाही, बागायती करायची म्हटली तर बॅँकेचे कर्ज मिळत नाही. सरकार योग्य मोबदला देत नसल्याने प्रकल्पबाधित शेतकरी पूर्णपणे हैराण झाले असून त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी या प्रश्नी चार बैठका झाल्या असून पालकमंत्र्यांना शिंदखेडा दौºयावेळी निवेदने दिली आहेत. मात्र अद्यात त्यातून काहीही मार्ग निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी त्रस्त झाले असून जमिनीला योग्य मोबदला द्या अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यासाठी इच्छामरणास परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मंत्री रावल यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केले. शेतकºयांच्या भावना याप्रश्नी तीव्र असून त्वरित मार्ग काढावा अशी त्यांची अपेक्षा असल्याचे देसाई यांना सांगितले. त्यावर लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रश्नी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मंत्री रावल यांनी या बैठकीची जबाबदारी घेत असल्याचे सांगून लवकरात लवकर बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त भाव देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. या आंदोलनात कैलास पाटील, प्रमोद सिसोदे, संजीवनी सिसोदे, भाजयुमोचे राम भदाणे, राजेंद्र पाटील, सत्यजित सिसोदे, कमलेश भामरे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.