शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या फळांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची ...

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची प्रचंड मागणी वाढली आहे. या पाच वस्तूची प्रतिदिन ७० ते १०० टन आवक होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वत: टरबूज विक्री करण्यास सुरुवात केल्याने स्वस्त दरात मिळणाऱ्या टरबूजला मागणी वाढली आहे. सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे खरेदीदेखील बाजारात वाढली आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन शासन-प्रशासनातर्फे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा नियमित आहारात समावेश करावा. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होते, असा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जात आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आयुष मंत्रालय व इतर आरोग्य संस्थांनीही कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देण्यास सांगितले आहे. व्हिटॅमिन सी असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने वर्षभरापासून लिंबूसदृश फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या फळांच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दरवाढ सामान्यांना परवडणारी नसली तरी आरोग्यासाठी सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांना व्हिटॅमिन सी आणि या फळांबद्दल किंवा आहाराबद्दल परिस्थितीमुळे माहिती करून घेण्याचीही गरज वाटत नाही.

कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य जनता आपापले घरगुती काढे, ज्यूस, औषधोपचारही करताहेत. कोरोना काळात दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. तसेच उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने पाण्याचे प्रमाण स्थिर असते.

फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ

कोरोनाच्या आजारावर उतारा म्हणून या फळांकडे पाहिले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता नसल्याने फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फळ विक्रेते सांगतात. वीकेंड लाॅकडाऊनमुळे फळांचा बाजारही बंद आहे. लिंबू ३०० ते ३५० रुपये किलो, मोसंबी ९० ते ११० रुपये आणि संत्री ८० ते १०० रुपये किलोचा दर गाठला आहे.