शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या फळांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची ...

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची प्रचंड मागणी वाढली आहे. या पाच वस्तूची प्रतिदिन ७० ते १०० टन आवक होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वत: टरबूज विक्री करण्यास सुरुवात केल्याने स्वस्त दरात मिळणाऱ्या टरबूजला मागणी वाढली आहे. सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे खरेदीदेखील बाजारात वाढली आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन शासन-प्रशासनातर्फे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा नियमित आहारात समावेश करावा. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होते, असा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जात आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आयुष मंत्रालय व इतर आरोग्य संस्थांनीही कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देण्यास सांगितले आहे. व्हिटॅमिन सी असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने वर्षभरापासून लिंबूसदृश फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या फळांच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दरवाढ सामान्यांना परवडणारी नसली तरी आरोग्यासाठी सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांना व्हिटॅमिन सी आणि या फळांबद्दल किंवा आहाराबद्दल परिस्थितीमुळे माहिती करून घेण्याचीही गरज वाटत नाही.

कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य जनता आपापले घरगुती काढे, ज्यूस, औषधोपचारही करताहेत. कोरोना काळात दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. तसेच उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने पाण्याचे प्रमाण स्थिर असते.

फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ

कोरोनाच्या आजारावर उतारा म्हणून या फळांकडे पाहिले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता नसल्याने फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फळ विक्रेते सांगतात. वीकेंड लाॅकडाऊनमुळे फळांचा बाजारही बंद आहे. लिंबू ३०० ते ३५० रुपये किलो, मोसंबी ९० ते ११० रुपये आणि संत्री ८० ते १०० रुपये किलोचा दर गाठला आहे.