शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीने केले दोंडाईचा आगाराला मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:16 IST

एका आठवड्यात मिळाले ३१ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईचासह राज्यात राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी वाहतूक बंद केली होती. दरम्यान कोरोना रुग्णांची घटती संख्या व दीपावलीच्या काळात दोंडाईचा आगाराने वाढविलेल्या विविध गावांचा फेऱ्या आदींमुळे दोंडाईचा एस.टी. आगार आठवडाभरात मालामाल झाले आहे. दीपावलीच्या काळात दोंडाईचा आगाराने आठवडे भरात ३१ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यभरात प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. मध्यतरी जिल्हा अंतर्गत एका सीटवर एक प्रवाशी वाहतुकीस परवानगी मिळाली होती. उत्पन्न कमी झाल्याचा पार्श्वभूमीवर माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यात दोंडाईचा आगाराला पावणेचार लाखाचे उत्पन्न मिळाले.राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशाने आता पूर्ण क्षमतेने दोंडाईचा आगारातून प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोंडाईचा आगारातून लांब पल्ल्याच्या कल्याण, नाशिक, परभणी, जळगाव, औरंगाबाद, पुणे यांच्यासह सुरत, वापी या अन्य राज्यीय बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय प्रवाशी वाहतूक सुरू झाली. प्रवाशाचा चांगला प्रतिसास मिळत आहे. आगार कार्यालयात सॅनिटायझर दिसले. परंतू बहुसंख्य प्रवाशांनी मास्क लावलेले दिसले नाही, फिजीकल डिस्टन्सिंग अजिबात दिसले नाही, बसमध्ये चढताना वा उतरतांना प्रवाशांनी गर्दी केलेली दिसली. कोरोना हद्दपार झाल्याची भावना प्रवाशांमध्ये दिसून आली. प्रवाशांचा हलगर्जीपणा कोरोनास आमंत्रण देऊ शकतो.दरम्यान, दीपावलीचा सण व वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेता दोंडाईचा आगाराने बस फेऱ्याची संख्या वाढविलेली आहे. पुण्याचा दोन फेऱ्या होत होत्या. त्या आता सहा करण्यात आल्या आहेत. नाशिक १० फेऱ्या होत्या, त्या आता १२ तर जळगावच्या ८ फेऱ्या होत्या, त्या आता १२ करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात फक्त ४ ते ५ हजार कि.मी. प्रवास करीत असत. आता बस सुमारे १६ हजार कि.मी. प्रवास करीत आहेत.लॉकडाऊन काळात दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न होते. आता पाच ते साडेपाच लाखाचे उत्पन्न झाले आहे. आता सर्व बसेस मिळून ११९ फेऱ्या होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या त्यातून वाढणारे उत्पन्न यामुळे कर्मचाऱ्यांतही समाधान निर्माण झालेले दिसले. आगारास पूर्वीचे चांगले दिवस येतील, असा आशावाद त्यांच्यात दिसला.दीपावलीचा कार्यकाळ बघता दोंडाईचा आगाराने गाड्याची व फेऱ्याची संख्या वाढवली आहे. दररोज ८ ते ९ हजार प्रवाशी प्रवास करीत आहेत. तर बसेस दररोज १५ ते १६ हजार किमी धावत आहेत. १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या आठवडाभरात दोडाईचा आगारास चांगले उत्पन्न मिळाले. १२ नोव्हेंबरला ३ लाख १० हजार, १३ नोव्हेंबरला ४ लाख १० हजार, १४ नोव्हेंबरला ३ लाख ५० हजार, १५ नोव्हेंबरला ५ लाख, १६ व १७ नोव्हेंबरला प्रत्येकी ५ लाख ५० हजार तर १८ नोव्हेंबरला ५ लाख असे ३१ लाख ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याची माहिती दोंडाईचा आगार सूत्रांनी दिली.