शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:25 IST

धुळे शहर वाहतूक शाखा : वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल 

ठळक मुद्देआता विनागिअरच्या दुचाकींचे प्रमाण सध्या वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी दुचाकी चालविता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून दुचाकी चालवत बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवर व्यक्ती काय बोलतेय याकडे असतेविनागिअरची दुचाकी चालविणारे काही वाहनचालक वाहन चालवित असताना सोशल मीडियावरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे वाहनावरील संपूर्ण दुर्लक्ष होते़ त्यामुळे अचानक कोणी वाहनासमोर आल्यास अपघाताची दाट शक्यता असते. धुळे शहर वाहतूक शाखेने फेबु्रवारी २०१७ मध्ये शहरात मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या महिन्यात २७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असलेतरी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºया ५२४ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ ‘फॅशन’पुरता राहिला नसून ती मूलभूत गरज झालेली आहे़ असे असलेतरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे़ विशेषत: मोटारसायकल चालविताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक ‘हॅण्डस् फ्री’ सिस्टिम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टॅण्ड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असली तर अपघाताचा धोका आणखीनच वाढतो़ गेल्या वर्षभरात वाहनचालकांवर कारवाई करूनही  वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. शहरातील वर्दळीच्या  जागी नागरिक त्यांची वाहने कुठेही उभी करतात. परिणामी, वाहतूक पोलीस कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक व वाहनचालकांना बसतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यावर गस्त वाढविणे आवश्यक असून शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी त्यांचा ‘वचक’ निर्माण करायला हवा, असा सूर व्यक्त होत आहे. 

मोबाइल हातात धरून कोणीही वाहन चालवू नये़ याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते़ असे कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते़ दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहन चालविताना स्वत:ची आणि दुसºयाची काळजी घेणे हा आहे़ असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सांगितले़