शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:25 IST

धुळे शहर वाहतूक शाखा : वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल 

ठळक मुद्देआता विनागिअरच्या दुचाकींचे प्रमाण सध्या वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी दुचाकी चालविता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून दुचाकी चालवत बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवर व्यक्ती काय बोलतेय याकडे असतेविनागिअरची दुचाकी चालविणारे काही वाहनचालक वाहन चालवित असताना सोशल मीडियावरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे वाहनावरील संपूर्ण दुर्लक्ष होते़ त्यामुळे अचानक कोणी वाहनासमोर आल्यास अपघाताची दाट शक्यता असते. धुळे शहर वाहतूक शाखेने फेबु्रवारी २०१७ मध्ये शहरात मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या महिन्यात २७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असलेतरी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºया ५२४ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ ‘फॅशन’पुरता राहिला नसून ती मूलभूत गरज झालेली आहे़ असे असलेतरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे़ विशेषत: मोटारसायकल चालविताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक ‘हॅण्डस् फ्री’ सिस्टिम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टॅण्ड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असली तर अपघाताचा धोका आणखीनच वाढतो़ गेल्या वर्षभरात वाहनचालकांवर कारवाई करूनही  वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. शहरातील वर्दळीच्या  जागी नागरिक त्यांची वाहने कुठेही उभी करतात. परिणामी, वाहतूक पोलीस कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक व वाहनचालकांना बसतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यावर गस्त वाढविणे आवश्यक असून शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी त्यांचा ‘वचक’ निर्माण करायला हवा, असा सूर व्यक्त होत आहे. 

मोबाइल हातात धरून कोणीही वाहन चालवू नये़ याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते़ असे कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते़ दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहन चालविताना स्वत:ची आणि दुसºयाची काळजी घेणे हा आहे़ असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सांगितले़