शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:25 IST

धुळे शहर वाहतूक शाखा : वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल 

ठळक मुद्देआता विनागिअरच्या दुचाकींचे प्रमाण सध्या वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी दुचाकी चालविता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून दुचाकी चालवत बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवर व्यक्ती काय बोलतेय याकडे असतेविनागिअरची दुचाकी चालविणारे काही वाहनचालक वाहन चालवित असताना सोशल मीडियावरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे वाहनावरील संपूर्ण दुर्लक्ष होते़ त्यामुळे अचानक कोणी वाहनासमोर आल्यास अपघाताची दाट शक्यता असते. धुळे शहर वाहतूक शाखेने फेबु्रवारी २०१७ मध्ये शहरात मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या महिन्यात २७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असलेतरी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºया ५२४ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ ‘फॅशन’पुरता राहिला नसून ती मूलभूत गरज झालेली आहे़ असे असलेतरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे़ विशेषत: मोटारसायकल चालविताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक ‘हॅण्डस् फ्री’ सिस्टिम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टॅण्ड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असली तर अपघाताचा धोका आणखीनच वाढतो़ गेल्या वर्षभरात वाहनचालकांवर कारवाई करूनही  वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. शहरातील वर्दळीच्या  जागी नागरिक त्यांची वाहने कुठेही उभी करतात. परिणामी, वाहतूक पोलीस कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक व वाहनचालकांना बसतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यावर गस्त वाढविणे आवश्यक असून शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी त्यांचा ‘वचक’ निर्माण करायला हवा, असा सूर व्यक्त होत आहे. 

मोबाइल हातात धरून कोणीही वाहन चालवू नये़ याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते़ असे कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते़ दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहन चालविताना स्वत:ची आणि दुसºयाची काळजी घेणे हा आहे़ असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सांगितले़