शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धरण उशाला, कोरड घशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:11 IST

ग्रामस्थांची वणवण : म्हसाळे येथे भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी नळ पाणी योजना बंद

निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्याच्या पुर्वेला असलेल्या म्हसाळे गावात वाढत्या तापमानाबरोबर भिषण दुष्काळी स्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र रूप घेत आहे. दोर, बादली घेऊन गाव विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिला, मुलांची झुंबड उडत आहे. गावाची नळ पाणी योजना याअगोदरच पाण्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. गावालगत धरण असूनही उपयोगास परवानगी नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला, अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे.निजामपूर-लामकानी रस्त्यावर दीड हजार वस्तीचे म्हसाळे गाव आहे. हा पर्जन्यछायेचा भाग गणला जातो. पावसाळ्यात या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. परिसरातील पाझर तलाव, नदी, नाले पार कोरडे आहेत. त्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, अशी समस्या निर्माण झाली आहे. म्हसाळे धरणावर गुरांना पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.गावासाठी असलेली नळ पाणी पुरवठा योजना दक्षिणेकडील बापूजी धरणाखालील विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पण त्या विहिरीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे.गावासाठी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, ते पाणी नळाद्वारे देणे शक्य नसल्याने ते पाणी आणून गाव विहिरीत टाकण्यात येते. त्यातून दोर बादलीद्वारे महिला, पुरुष पाणी भरून नेतात. इतकाच काय तो गावास आधार आहे. पाणी मिळविण्यासाठी येथे मोठी गर्दी होते.गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर गारबर्डी धरण आहे. त्याची उंची व लांबी वाढविली तर पावसाळ्यात पाणीसाठा वाढेल. जलसिंचन वाढेल, शिवाय पिण्याचा पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासाठी सतत चार वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे गुलाबराव का. माळी यांनी सांगितले. परंतू उपयोग झालेला नाही.तीव्र उन्हामुळे भूगर्भातील पाणी संपते आहे. गावालगत असलेल्या धरणाला म्हसाळे धरण नाव दिले आहे. मात्र, या धरणाचा म्हसाळेच्या लोकांसाठी पाणी मिळण्यात यत्किंचितही उपयोग होत नाही. या धरणाखाली विहीर खोदण्यास परवानगी मिळावी म्हणून ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ गेले होते. पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. परवानगी मिळू शकली नाही. सरपंच भागाबाई दिलीप सोनवणे, उपसरपंच रुपाली गुलाब माळी व सदस्यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नी लवचिक, सकारात्मक धोरण घेण्याची आवश्यकता अपेक्षित केली आहे.यापूर्वी सन २०१४, २०१७ मध्ये गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता तशी वेळ येऊ नये म्हणून गारबर्डी धरणाची उंची व लांबी वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे