शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गावाचे कारभारी कोण ठरणार याची लागली उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

दरम्यान, आता उत्सुकता लागलेली आहे ती मतमोजणीची. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासनानेही मतदानाची पूर्ण ...

दरम्यान, आता उत्सुकता लागलेली आहे ती मतमोजणीची. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. प्रशासनानेही मतदानाची पूर्ण तयारी केलेली आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालेले असले, तरी ग्रामस्थांना आपल्या गावाचा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवित भरघोस मतदान केलेले होते. हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.

गेल्या दहा-अकरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. कुठेही प्रचार सभा, अथवा मोठ्या नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला, तरी छुप्या पद्धतीने सर्वच पक्षाचे नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. अर्ज माघारीनंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर लागलीच अनेक पक्षांना झेंडा फडकविल्याचा दावा केलेला आहे.

मात्र, ग्रामपंचायती निवडणुका या पक्षाच्या झेंड्याऐवजी स्थानिक पातळीवरच लढवल्या जातात. प्रत्येक गावातील पॅनल प्रमुखांनीही निवडणुकीसाठी प्रचंड जोर लावलेला होता. वॉर्ड लहान असले, तरी एकाच वॅार्डात दोन-तीन उमेदवार असल्याने, प्रचंड चुरस निर्माण झालेली होती. काही ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेही चित्र दिसून आले. मात्र, आता हे सर्व आटोपले असून, आता पुढील पाच वर्षांसाठी आपल्या वॉर्डाचा प्रतिनिधी, तसेच गावाचे कारभारी कोण-कोण होतात, याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे.

अद्याप सरपंच आरक्षण जाहीर झालेले नाही. मात्र, या निवडलेल्या सदस्यांमधूनच सरपंच होणार असल्याने, सरपंचपदाची माळ कोणत्या प्रवर्गाच्या गळ्यात पडणार, ते येत्या काही महिन्यात समजणार आहे.