शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रस्त्यावर गर्दी, लॉकडाऊन नावालाच, मनपाने ॲक्शन घ्यावी, स्थायी समितीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपायुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह ...

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपायुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी, हिना पठाण आदींची उपस्थिती होती.

इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये

नगरसेवक सुनील बैसाणे यांनी महापालिकेतून फाइली, नस्ती, गहाळ व चोरी होत असल्याचा आरोप केला. मी स्थायी सभापती असताना एक फाइल गहाळ झाल्याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही अज्ञात व्यक्ती कोण आणि चोरी होत असेल तर अधिकारी व कर्मचारी करतात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचार लपविण्यासाठी महापालिकेत जळीतकांड झाले होते. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १६ लाख रुपयांचा कामांचा प्रस्ताव असून, ठेकेदाराला कार्यादेश देखील देण्यात आले. कामांच्या नस्तींबाबत चौकशी केली असता ती चोरीस गेल्याचे समोर आले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

खाली बसण्याचा इशारा

प्रभागातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. हेतुपुरस्कार असे होत असेल तर ही बाब योग्य नाही. पुढील बैठकीपर्यंत पाणीप्रश्न सुटला नाही तर पुढच्या बैठकीत आपण चटई टाकून खाली बसून निषेध नोंदवू, असा इशारा सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार यांनी दिला. त्यासंदर्भात त्यांनी सभापती जाधव यांना निवेदनदेखील सादर केले.

डायरियाचा उद्रेक

अल्पसंख्याक भागात दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पाच ते सहा जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. गेल्या दोन बैठकांपासून हा मुद्दा आपण मांडत आहोत. त्यानंतर प्रभागात सर्वेक्षणदेखील झाले. मात्र डायरियाचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. लवकरात लवकर याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी अमिन पटेल यांनी केली.

रुग्णचालकाकडून लूट

कोरोनाबाधित रुग्णांसह नातेवाइकाकडून रुग्णवाहिका चालक व मालकाकडून अक्षरश: लूट सुरू झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महापालिकेच्या दोन रुग्णवाहिका असून, त्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने रुग्णवाहिकेला व्हेंटिलेटरची सुविधा करावी, अशी मागणी अमिन पटेल, अमोल मासुळे यांनी केली.

लसीकरणासाठी नोंद गरजेची

डॉ. महेश मोरे म्हणाले, शहरात २३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शासन निर्देशानुसार एका केंद्रावर १०० लसींचा पुरवठा केला जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र तसे हाेत नसल्याने गर्दी व गोंधळ उडतो आहे. यापुढे केंद्रावर सर्वांत अगोदर येणाऱ्या शंभर जणांनाच टोकण देऊन लस दिली जाईल, असे नियोजन केले आहे.