शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात पावसाअभावी पिके संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST

शिरपूर : यंदा पर्जन्यमान अति उत्तम असल्याचे सांगितले जात होते़ त्यानुसार मान्सूनचे आगमनही वेळेवर झाले होते़ सुरूवातीच्या ...

शिरपूर : यंदा पर्जन्यमान अति उत्तम असल्याचे सांगितले जात होते़ त्यानुसार मान्सूनचे आगमनही वेळेवर झाले होते़ सुरूवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र, त्यानंतर गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे़

शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़ तालुक्यात आतापर्यंत केवळ २१६ मिमी पाऊस झाला आहे़ केवळ ३३ टक्के पाऊस झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत़ श्रावण महिना सुरू झाला. ऑगस्ट महिना निम्मा झाला तरीदेखील दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील नदी-नाले पाण्याने खळखळून वाहिले नाहीत़, तर विहिरींची पाणीपातळी वाढली नाही़ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पाऊस झाला़ मात्र, आतापर्यंत दमदार पाऊस बोराडी, सांगवी वगळता अन्य भागांत कुठेच झाला नाही़ केवळ ३३ टक्केच या तालुक्यात आतापर्यंत पाऊस झाला आहे़ थाळनेर व होळनांथे मंडळात अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाही़ पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे़ अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवडी केली आहे़ त्यामुळे बहुतांशी भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे़ तालुक्यात नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाची सर्वाधिक ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे़ त्या खालोखाल सोयाबीन ६१३०, मका ७९८०, खरीप बाजरी ४७७१, ज्वारी ३७२८, ऊस २१२८, मूग ३४४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे़

गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे़ त्यामुळे पुन्हा पिकांनी माना टाकल्या आहेत़ येत्या दोन-चार दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत़ ऐन हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या अवस्थेत असून, जमिनीला मोठमोठ्या भेगा पडत असल्याने शेतजमिनीसह आता शेतकऱ्यांची मनेही भेगाळली आहेत़ पेरणीपूर्वी पडणारा अन् पेरणीनंतरचा पाऊस मात्र गायब झाला आहे़ दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे़ यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे़

अशी झाली पेरणी़़़

तृणधान्य १७५११ पैकी १६७३४

कडधान्य ७६९८ पैकी ६०९२

गळीत धान्य ९८८० पैकी ७१३७

एकूण १०४१७३ पैकी ९९७५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे़

झालेला पाऊस़़़

१६ रोजी पर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे- शिरपूर २१६ मिमी, थाळनेर- १२२, होळनांथे- ११५, अर्थे- १५३, जवखेडा-१४८, बोराडी-२४४, सांगवी-२१२ मिमी आतापर्यंत झाला आहे़

शेतकरी काय म्हणतात़़

पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे़ पिके वाचविण्यासाठी ठिबकद्वारे पाणी द्यावे लागत आहे़ कोरडवाहू शेतकऱ्यांचे अधिक हाल होत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे़ महागडे औषधी, बियाणे व मजुरांचा खर्च करून पेरणी केली़; परंतु पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़

- छगन गुजर, शेतकरी निमझरी

आगोदर चांगले पर्जन्य झाले, नंतर पावसाने दडी मारली़ त्यामुळे वाढायला लागलेले पिके कडक उन्हामुळे कोेमेजून जात आहेत़ सोयाबीन लागलेले फुले गळत असून, कापसाचीही तीच अवस्था आहे़ आता पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांसमोर अवघड परिस्थिती उभी टाकली आहे़

- विकास पावरा, शेतकरी रोहिणी