शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

पीक विमा योजनेतील अडचणी, त्रूटी दूर करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:21 IST

राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकºयांसाठी फायदेशीर असली तरी बºयाच अडचणी सोडविण्याची गरज आहे, अशी सूचना राज्याचे प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी योजनेच्या राष्टÑीय आढावा बैठकीत मांडली. बंगळुरू येथे नुकतीच ही बैठक पार पडली. त्यात राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड करण्यात आली होती. बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत अ‍ॅड.पाटील यांनी सर्वसामान्य शेतकºयांना अडचणीच्या ठरणाºया अनेक बाबी, तरतुदी लक्षात आणून दिल्या. त्यात मुख्यत्वे पीक विमाच्या देश, राज्य व जिल्हा स्तरीय या समित्यांमध्ये  ज्याच्याकरीता ही योजना आहे त्यास म्हणजे शेतकºयास प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी सोडविल्या जात नाही, ही बाब निदर्शनास आणली. योजनेत विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै व ३१ डिसेंबर असते.शेवटच्या दोन-तीन दिवस शेतकºयांची एकदम गर्दी होते. तांत्रिक कारणामुळे मुदतवाढ देण्यात अडचणी येतात. त्यापेक्षा मुदत १५ जुलै व १५ डिसेंबर द्यावी आणि  १५ दिवस मुदतवाढ देण्याचे अधिकार राज्य सरकारला द्या, आदी मागण्या मांडल्या. या दोनदिवसीय चर्चासत्रात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल, अतिरिक्त सचिव देवेश चतुर्वेदी, पीक विमा योजनेचे सीईओ डॉ.आशिषकुमार भुतानी, पल्लवी माळी या अधिकाºयांसह राज्याचे मुख्य सांख्यिकी उदय देशमुख व इतर राज्यांचे शेतकरीही उपस्थित होते.बैठकीतील अन्य महत्त्वपूर्ण सूचना विमा नुकसान भरपाई वेळेतच दिली गेली पाहिजे. ती न दिल्यास १२ टक्के व्याजदर देय होतो. त्यासोबत ज्याची यात चूक असेल (राज्य शासन, विमा कंपनी) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तो निधी विमाधारक शेतकरी बांधवांकरीता वापरावा. विमा कंपनीस टेंडर प्रक्रिया करताना पारदर्शकता ठेवावी. कारण आज ही योजना शेतकºयांसाठी नसून विमा कंपन्यांकरीता असल्याचा आरोप होतो आहे. त्यात काही अंशी तथ्यसुध्दा वाटते, योजनेच्या चांगल्या बाबी जनतेपर्यंत येत नाहीत व शेतकºयांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सकारात्मक शेतकºयांची निवड करुन, प्रशिक्षण देऊन, त्यांच्या समितीमार्फत योजना राबवावी. स्थानिक वादळ, गारपीटमुळे होणाºया नुकसानीचे पंचनामे मुदतीत व्हावे, विमाधारक शेतकरी यादी, मंजूर यादी, नुकसान भरपाई वाटप यादी ही संबंधित बँक व ग्रामपंचायत कार्यालयात लावावी. संबधित विमा कंपनीचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असावे.,विमा कंपनीस फोन लावला तर फोन उचलला जात नाही.त्याचे कारण भरपूर फोन येतात, असे सांगितले जाते.त्यामुळे कंपनीने जिल्ह्यात जास्त प्रतिनिधी नेमावेत.

टॅग्स :Dhuleधुळे