शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेतील अडचणी, त्रूटी दूर करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:21 IST

राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकºयांसाठी फायदेशीर असली तरी बºयाच अडचणी सोडविण्याची गरज आहे, अशी सूचना राज्याचे प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी योजनेच्या राष्टÑीय आढावा बैठकीत मांडली. बंगळुरू येथे नुकतीच ही बैठक पार पडली. त्यात राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड करण्यात आली होती. बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत अ‍ॅड.पाटील यांनी सर्वसामान्य शेतकºयांना अडचणीच्या ठरणाºया अनेक बाबी, तरतुदी लक्षात आणून दिल्या. त्यात मुख्यत्वे पीक विमाच्या देश, राज्य व जिल्हा स्तरीय या समित्यांमध्ये  ज्याच्याकरीता ही योजना आहे त्यास म्हणजे शेतकºयास प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी सोडविल्या जात नाही, ही बाब निदर्शनास आणली. योजनेत विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै व ३१ डिसेंबर असते.शेवटच्या दोन-तीन दिवस शेतकºयांची एकदम गर्दी होते. तांत्रिक कारणामुळे मुदतवाढ देण्यात अडचणी येतात. त्यापेक्षा मुदत १५ जुलै व १५ डिसेंबर द्यावी आणि  १५ दिवस मुदतवाढ देण्याचे अधिकार राज्य सरकारला द्या, आदी मागण्या मांडल्या. या दोनदिवसीय चर्चासत्रात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल, अतिरिक्त सचिव देवेश चतुर्वेदी, पीक विमा योजनेचे सीईओ डॉ.आशिषकुमार भुतानी, पल्लवी माळी या अधिकाºयांसह राज्याचे मुख्य सांख्यिकी उदय देशमुख व इतर राज्यांचे शेतकरीही उपस्थित होते.बैठकीतील अन्य महत्त्वपूर्ण सूचना विमा नुकसान भरपाई वेळेतच दिली गेली पाहिजे. ती न दिल्यास १२ टक्के व्याजदर देय होतो. त्यासोबत ज्याची यात चूक असेल (राज्य शासन, विमा कंपनी) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तो निधी विमाधारक शेतकरी बांधवांकरीता वापरावा. विमा कंपनीस टेंडर प्रक्रिया करताना पारदर्शकता ठेवावी. कारण आज ही योजना शेतकºयांसाठी नसून विमा कंपन्यांकरीता असल्याचा आरोप होतो आहे. त्यात काही अंशी तथ्यसुध्दा वाटते, योजनेच्या चांगल्या बाबी जनतेपर्यंत येत नाहीत व शेतकºयांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सकारात्मक शेतकºयांची निवड करुन, प्रशिक्षण देऊन, त्यांच्या समितीमार्फत योजना राबवावी. स्थानिक वादळ, गारपीटमुळे होणाºया नुकसानीचे पंचनामे मुदतीत व्हावे, विमाधारक शेतकरी यादी, मंजूर यादी, नुकसान भरपाई वाटप यादी ही संबंधित बँक व ग्रामपंचायत कार्यालयात लावावी. संबधित विमा कंपनीचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असावे.,विमा कंपनीस फोन लावला तर फोन उचलला जात नाही.त्याचे कारण भरपूर फोन येतात, असे सांगितले जाते.त्यामुळे कंपनीने जिल्ह्यात जास्त प्रतिनिधी नेमावेत.

टॅग्स :Dhuleधुळे