शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 19:57 IST

हातातोंडाशी घास गेला वाया : ज्वारी, कपाशीचे पिके भुईसपाट, पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही, तोच शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पुन्हा एकदा खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.कापडणे (ता. धुळे)धुळे तालुक्यातील कापडणे गावासह कौठळ गावात १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजे नंतर विजांचा कडकडासह वादळी पाऊस झाला. यामुळे खखरीप हंगामातील कपाशी बाजरी मका सर्वत्र डोलदार पिके आडवे पडून जमीनदोस्त झालीत शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यंदाच्या खरीप हंगामात वेळेच्या आधीच अर्थात एक जून रोजी धुळे तालुक्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर जून महिन्यात तब्बल पंधरा ते सोळा दिवस मध्यम जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात पावसाने मात्र जास्तच कहर केला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील वादळीवाºयासह पाऊस झाला. ४ व ५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालो. यातून सावरत नाही, तोच १९ रोजी रात्री पुन्हा रात्री दोन ते तीन तास वादळ वाºयासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील सर्वत्र डोलदार काढणीवर आलेले शेती पिके अतिवृष्टीमुळे व वादळामुळे आडवी पडून जमीनदोस्त झालेली आहेत.मोहाडी प्र डांगरी (ता.धुळे)येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फायदा कमी नुकसानच जास्त झाले शेतीचा हंगाम ऐन भरात असतांना ,अचानक आलेल्या परतीच्या पावसाने मोहाडी सह परिसरातील गावांमध्येही शेतकº्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात वेचण्यासाठी तयार असलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापूस झाडावर ओला होऊन बोंडे अक्षरश: लोंबकळून जमीनदोस्त झाली. तसेच काढणीला आलेला भुईमुगाच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पक्व झालेल्या शेंगांचे आता कोंब फुटूनवर येऊ लागतील. तिळीचे पीक पण पाण्यातच गेले आहे. आधीच मूग, उडीद आदी कडधान्य खराब झाले.चारा पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे. बाजरी पण काळवंडली असून ज्वारीपण त्याच मार्गावर आहे.आता बरे होण्याच्या मार्गावर असलेले शेतशिवार रस्ते अजून एक महिना आता दुरुस्त होणार नाहीत.त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा.दुसाणे (ता.साक्री)साक्री तालुक्यातील दुसाणे व आजूबाजूच्या परिसरात १९ सप्टेंबर रोजी रात्री वादळी वाº्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात शेतकº्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही शेतकº्यांचा अगदी तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाला. यात कांदा,कापूस, ज्वारी,बाजरी या पिकांचे खूप नुकसान झाले.बाजरी व ज्वारी काढणीची वेळ आली होती. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकº्याची एकच तारांबळ उडाली. कापूस वेचणीच्या कामाला वेग आला होता, परंतु सर्व कापूस देखील गळून गेला. उर्वरित कापसाच्या झाडावरचे संपूर्ण बोंड वादळामुळे गळून पडली आहेत. तसेच फळबागेत पपई, अ‍ॅपल बोर , ऊस , केळी याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकº्याला तारणहार ठरणारे गवार पिकाच्या शेवटच्या तोडणी बाकी होत्या. ते पीक देखील पूर्णत: वाया गेले. तर या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस शनिवारी झाला. या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे तार तुटून पडल्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झालेला होता.दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.