शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कापूस फुटला; पण मजूर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:14 IST

तºहाडी : २० किलो कापूस वेचणीसाठी १०० ते १२० रुपये मजुरी, तरीही मजुरांची टंचाई

तºहाडी : चार दिवसापासून अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतातील फुटलेल्या कापूस वेचणीची लगबग शेतकऱ्यांकडून सुरु आहे. काही शेतातील उभे असलेल्या ज्वारी, मका, सोयाबीन पिकांची कापणी तसेच काढणीलासुध्दा वेग आल्याने शेतमजूर व्यस्त झाले आहेत. यामुळे फूटलेल्या कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर मजूर शोधण्याची वेळ आलेली आहे.मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कपाशी व मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून चिखल झाला होता.यामुळे कपाशीचे बोंड फूटले नव्हते. परंतू मागील चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून ऊन पडत आहे. यामुळे तापत्या उन्हात कपाशी बोंड फूटल्याने शेताने पांढराशालू पांगरल्याचे दिसत आहे. कापूस वेचणी करण्याची लगबग शेतकºयांना लागलेली आहे. परंतू अवकाळी पावसामुळे थैमान घातल्याने अनेक शेतात मका, ज्वारी, सोयाबीन कापणी व काढणीला विलंब झाल्याने शेतातील सोयाबीन पिकांची कापणी व काढणीची संपुर्ण कामे सुरु असून सोयाबीनची मजूरी जास्त मिळत असल्याने सर्वाधिक शेतमजूर सोयाबीन शेतीकडे जात असल्याने शेतातील फूटलेल्या कापसाची वेचणी करण्याकरिता मजूर मिळत नाही.इकडून तिकडून मोजकेच मजूर मिळाले तरी २० किलो कापुस वेचणी करिता १०० ते १२० रुपये मजूरी देण्यात येत आहे. तसेच मजुरांना घरून शेतात ये-जा करण्यासाठी रिक्षा भाडे सुद्धा देण्याची वेळ शेतकºयांवर आलेली आहे. तरीही शेतातील फूटलेल्या कपाशीची वेचणीकरिता शेतकºयांना मजूर मिळत नसून बाहेरगावावरून जादा मजूरी देवून मजूरांना घेवून यावे लागत असल्याने अगोदरच पावसाने त्रस्त झालेल्या शेतकºयांना जादा दराने सोयाबीन काढणी व कापूस वेचणी करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अवकाळी पावसामुळे शेतातील मक्याचे पीक खराब झाले आहे. दुसरीकडे कपाशीचे बोंड फूटले आहे. मात्र, कपाशी वेचणीसाठी मजूर सूध्दा मिळत नाही. यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला असून २० किलो कापूस वेचणीकरिता शंभर ते एकशे वीस रुपये मजूरी मागत असून तेवढी रक्कम दिल्यावरही वेळेवर मजूर मिळत नाही.-धनराज करके, शेतकरी तºहाडीदोन एकर शेतात पिकांची लागवड केली आहे. परंतू अवकाळी पावसाने शेतातील कापसाचे पिक खराब झाले असून उरले सुरलेल्या कापूस पिकाचे बोंड फूटले आहे. मात्र, कापूस वेचणीकरिता मजूर मिळत नाही. दररोज कापूस वेचणी करिता मजूर शोधण्याची वेळ आलेली आहे.-सुभाष भामरे, तºहाडी

टॅग्स :Dhuleधुळे