शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

भाजपला धक्का देत काँग्रेसने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST

धुळे तालुका तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भाजपत इनकमिंग व इतर पक्षांमध्ये आउटगोईंग जास्त ...

धुळे तालुका तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भाजपत इनकमिंग व इतर पक्षांमध्ये आउटगोईंग जास्त वाढल्याने, त्याचा फायदा भाजपला झालेला दिसून आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. मात्र तो करिष्मा पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत दाखविता आला नाही.

तालुक्यात अनेक ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनलची सत्ता ग्रामपंचायतींवर होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी धक्कादायक निकालाची परंपरा कायम ठेवली. तालुक्यातील नेर, बोरीस, शिरूड या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यातीनही ठिकाणी भाजपचीच सत्ता होती. मात्र मतदारांनी या तीनही ठिकाणी परिवर्तन घडवून आणले. त्या ठिकाणी काँग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता स्थापन झालेली आहे. कापडण्यातही काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

तसे बघितले गेल्यास या निवडणुकीत भाजप हा एकाकी पडलेला दिसून आला. तर काँग्रेसला मात्र राज्यातील महाविकास आघाडीचा फायदा झाला. काही ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी सोबत असल्याने त्याचा फायदा पक्षाला विजयात झाला. मात्र असे असले तरी भाजपनेही या निवडणुकीत चांगले आव्हान दिले हे विसरता येणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ७२ पैकी तब्बल ६५ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. तर यात भाजपही मागे नाही. भाजपने ३५ ग्रामपंचायतींवर दावा केलेला आहे.

या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आपला गड राखण्यास यशस्वी होऊ शकले नाही, ही चिंतनाची बाब आहे. उडाणे या गावी पंचायत समितीच्या सभापतीच्या पॅनलला विजय मिळविता आला नाही, तर जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींनाही कापडणे गावात जास्त जागा जिंकण्यात यश आलेले नाही. शिरुड गावात गेल्यावेळी भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र याठिकाणची सत्ता राखण्यात भाजपला यश आलेले नाही.

काँग्रेस पुरस्कृत पॅनलने या निवडणुकीत सरस कामगिरी बजावली असेच या निकालावरून स्पष्ट होते. माजी मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत काँग्रेस समर्थक पॅनलला अनेक ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचविले आहे.

विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मतदारांनी दिलेली आहे. आजचा तरुण ‘टेक्नोसेव्ही’ असल्याने, या नवनिर्वाचित तरुण सदस्यांकडून आपल्या गावाचा, वॉर्डाचा जास्तीत जास्त विकास व्हावा, अशी मतदारांची अपेक्षा आहे. या अपेक्षेला ते कितपत खरे ठरतात हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.