शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

लॉकडाऊन काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

गुन्हे परत कसे घेतले जातात लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेली संचारबंदी आणि याच कालावधीत काही लाेकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे हा ...

गुन्हे परत कसे घेतले जातात

लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेली संचारबंदी आणि याच कालावधीत काही लाेकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे हा चिंतेचा विषय ठरलेला होता. आता गुन्हे मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असलेतरी ज्या ज्या पोलीस स्टेशनअंतर्गत जे गुन्हे दाखल होतात, ते गुन्हे परस्पर मागे घेतले जात नाही. न्यायालयात गुन्हे मागे घेण्याबाबतचे ठोस पुरावे, कागदपत्रे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे मागे घेण्याबाबत विचार होत असतो. यात न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे.

विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्यांवर सर्वाधिक गुन्हे

- लाॅकडाऊन असल्यामुळे लोेकांच्या भल्यासाठी संचारबंदी लागू केली होती. लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर निघू नये, एवढाच उद्देश त्यामागे होता. तरीदेखील शासन आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे हे अन्य गुन्ह्यांपेक्षा तसे सर्वाधिक ठरले.

- संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ निश्चित करण्यात येऊनही बरीच दुकाने ही ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त सुरू होती. त्यांना वेळोवेळी समजदेखील देण्यात आली. पण त्यांच्यात काही फरक पडत नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली. नियमांचे पालन त्यांच्याकडून होताना दिसून आले नाही.

- लॉकडाऊन काळात बंदी असतानादेखील जमाबंदी आदेशाचे उल्लंघनदेखील अनेकांकडून झाले आहे. गर्दी न करणे असे अभिप्रेत असतानादेखील विनाकारण त्यांच्याकडून गर्दी केली जात होती. तसेच जिल्हाबंदी केली गेली असतानादेखील प्रवास करण्याचे बऱ्याच जणांनी काही टाळले नाही. परवानगी नसताना प्रवास करणारे आढळल्यामुळे त्यांच्यावरदेखील पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षकांचा कोट

लॉकडाऊन काळात लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात काही जणांवर कारवाई करण्याची वेळ आली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. आता दाखल झालेले गुन्हे मागे घ्यायचे का नाही, हे शासन ठरवेल. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेताना शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक, धुळे.

लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे - ६९३

विनापरवानगी घराबाहेर पडणे - ५५१

जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे - १२२

विनापरवानगी प्रवास करणे - १५

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे - ०५