शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

By admin | Updated: March 2, 2015 13:09 IST

घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले.

 धुळे : महानगरपालिकेच्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. महानगरपालिकेच्या २0 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर जयश्री अहिरराव व सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला प्रखर विरोध केल्याने जनभावना लक्षात घेऊन पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर व्यावसायिक पाणीपट्टीत काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. परंतु महासभेपूर्वीच प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी पाणीपट्टीत वाढ होणे गरजेचे असल्याने अपेक्षित वाढ न झाल्यास महासभेच्या ठरावाचे विखंडन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान दोन हजार रुपयांची वाढ करावी, अशी मागणी तीन-चार दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांकडे करणार असून महासभा विखंडनाचा प्रस्तावही सादर करणार असल्याचे धनाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. महासभेत व्यावसायिक वापरासाठी घेण्यात आलेले अर्धा इंची नळकनेक्शन असल्यास ते बंद करावेत, पाऊण इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी वार्षिक पाणीपट्टी ७ हजार ५३६ वरून १२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी १६ हजार ५५२ वरून २५ हजार करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. महासभेत पाणीपुरवठय़ाच्या संवेदनशील विषयावर बोलताना महापौर जयश्री अहिरराव यांनी, शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत प्रत्येक नळावर मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर मीटरप्रमाणे घरगुती नळधारकांना बिल आकारण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु आयुक्त के.व्ही. धनाड यांनी कर्मचार्‍यांसह प्रत्येकाचीच अपेक्षा महानगरपालिकेकडून विकासकामे, थकबाकीची आहे. प्रभारी आयुक्त या नात्याने प्रत्येकाला तोंड द्यावे लागत असल्याने उत्पन्नवाढ गरजेचीच आहे. त्यामुळे महासभेचा ठराव विखंडित करून पाणीपट्टीत योग्य ती वाढ करवून घेणार असल्याचे प्र. आयुक्त धनाड म्हणाले. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे प्र. आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले व सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. शहरात घरगुती पाणीपट्टी वर्षाला केवळ १२00 रुपये आकारली जाते. राज्यात कोठेही इतकी कमी पाणीपट्टी आकारली जात नाही. ही रक्कम अत्यंत कमी असून नागरिकांनी किमान ४000 रुपये पाणीपट्टी भरल्यास दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी द्यायला तयार असल्याचेही आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले.