शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

By admin | Updated: March 2, 2015 13:09 IST

घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले.

 धुळे : महानगरपालिकेच्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. महानगरपालिकेच्या २0 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर जयश्री अहिरराव व सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला प्रखर विरोध केल्याने जनभावना लक्षात घेऊन पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर व्यावसायिक पाणीपट्टीत काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. परंतु महासभेपूर्वीच प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी पाणीपट्टीत वाढ होणे गरजेचे असल्याने अपेक्षित वाढ न झाल्यास महासभेच्या ठरावाचे विखंडन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान दोन हजार रुपयांची वाढ करावी, अशी मागणी तीन-चार दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांकडे करणार असून महासभा विखंडनाचा प्रस्तावही सादर करणार असल्याचे धनाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. महासभेत व्यावसायिक वापरासाठी घेण्यात आलेले अर्धा इंची नळकनेक्शन असल्यास ते बंद करावेत, पाऊण इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी वार्षिक पाणीपट्टी ७ हजार ५३६ वरून १२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी १६ हजार ५५२ वरून २५ हजार करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. महासभेत पाणीपुरवठय़ाच्या संवेदनशील विषयावर बोलताना महापौर जयश्री अहिरराव यांनी, शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत प्रत्येक नळावर मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर मीटरप्रमाणे घरगुती नळधारकांना बिल आकारण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु आयुक्त के.व्ही. धनाड यांनी कर्मचार्‍यांसह प्रत्येकाचीच अपेक्षा महानगरपालिकेकडून विकासकामे, थकबाकीची आहे. प्रभारी आयुक्त या नात्याने प्रत्येकाला तोंड द्यावे लागत असल्याने उत्पन्नवाढ गरजेचीच आहे. त्यामुळे महासभेचा ठराव विखंडित करून पाणीपट्टीत योग्य ती वाढ करवून घेणार असल्याचे प्र. आयुक्त धनाड म्हणाले. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे प्र. आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले व सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. शहरात घरगुती पाणीपट्टी वर्षाला केवळ १२00 रुपये आकारली जाते. राज्यात कोठेही इतकी कमी पाणीपट्टी आकारली जात नाही. ही रक्कम अत्यंत कमी असून नागरिकांनी किमान ४000 रुपये पाणीपट्टी भरल्यास दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी द्यायला तयार असल्याचेही आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले.