शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

कुमार नगरात नागरिक डेंग्यूने धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले ...

धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. मनपाकडून धुरळणी व फवारणी नियमित होत नसल्याने नागिरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साक्रीरोडवरील कुमारनगर भागात दाेन नागरिकांचा आतापर्यंत डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे.

साक्रीरोडवरील कुमार नगर परिसरात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे. परिसरात खड्डे असल्याने पावसाचे पाणी डबक्यात साचते. त्या भागातील पाण्याचा निचरा होण्याची नितांत गरज असताना पाण्याचा निचरा होत नाही. तर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी गटार साफ करण्यासाठी येतात. मात्र, नागरिकांकडून पैशांची मागणी होते. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूची साथ वाढत आहे. मनपाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रशांत तनेजा यांनी केली आहे.

खासगी रुग्णालयात उपचार

शहरात महिन्याभरापासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वातावणातील बदलामुळे डेंग्यू पसरविण्याऱ्या एडिस इजिप्ती डासांचा उद्रेक वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही जणांचे अहवाल डेंग्यूचे आढळून आले आहे. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणााऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

अंगदुखी व ताप

कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो. तसेच अंगदुखीचा त्रास होतो. कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी, खोकला होत नाही. झालाच तर प्रमाण कमी असते. डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आढळली आहेत. डेंग्यू या आजारात सांधेदुखीचा तीव्र त्रास जाणवतो.

पाणी उकळून प्या

पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यावे. जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावांतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते. पाणी उकळून प्यावे. त्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो याप्रकारचे त्रास होत नाहीत.

कोरडा दिवस पाळा

पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच विषाणूतच बदल होतो. विषाणूंचा बदल रोखणे आपल्या हातात नाही. पण परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची उत्पत्ती आपण रोखू शकतो. गच्चीवरील टायर, भंगार वस्तू यात पाणी साठू देऊ नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.

- डॉ. अनिल पाटील,

जिल्हा हिवताप अधिकारी