शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नागरिकांना कोरोनाचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

अशात जिल्हा व राज्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता वेळीच सावध पवित्रा व नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाने घालून ...

अशात जिल्हा व राज्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता वेळीच सावध पवित्रा व नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची गावात योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाचा उद्रेक होऊन संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

मालपूर हे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे गाव आहे. साहजिकच वर्दळ दिवसभर कायम दिसून येते. मात्र नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही. सरकारी कार्यालयात बँकेत सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. भाजीपाला विक्री ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आदी ठिकाणी नेमून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. यासाठी कोरोना संसर्गाचा पुनश्च निर्माण झालेला वेग लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासन व कोविड १९ समितीने वेळिच सावध पवित्रा घेणे आवश्यक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लग्न समारंभ व इतर का इतर कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आणावेत. नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडावर मास्क लावावा. किराणा दुकानदार भाजीपाला विक्रेते यांनी तोंडावर मास्कशिवाय ग्राहकांना आपल्या दुकानावर उभे राहू देऊ नये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर तसेच कुठल्याही समारंभात ५० पेक्षा जास्त जमा होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी, दक्षता न घेतल्यास दंडात्मक कारवाई व आपत्कालीन कारवाईचा बडगा उगारावा तरच शिस्त लागेल व यासाठी कठोर निर्णय घ्यावेत, तरच कोरोनावर नियंत्रण येईल अन्यथा उद्रेक झाल्या शिवाय रहाणार नाही असेच आजचे चित्र दिसून येत आहे.