शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कामगारांच्या पाल्यांना मिळाली साडेतेरा लाख शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST

या मंडळातर्फे दहावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या कामगाराच्या पाल्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येत असते. यात दहावी, अकरावी, १२वीपर्यंत दोन ...

या मंडळातर्फे दहावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या कामगाराच्या पाल्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येत असते. यात दहावी, अकरावी, १२वीपर्यंत दोन हजार रुपये, १३ वी ते १५ वीपर्यंत २५०० रुपये, दहावीनंतर डिप्लोमा केल्यास ३ हजार रुपये तर १२ वीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी नववीपासून किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तर अपंगांसाठी टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाही.

याशिवाय पाठ्यपुस्तक घेण्यासाठीही या मंडळातर्फे सहाय्य मिळत असते. ११ वीपासून पुढे क्रमिक पुस्तकांच्या ५० टक्के रक्कम मिळत असते.

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कामगाराने कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. कामगारासाठी वार्षिक सभासद फी १५ रुपये तर कुटुंबीयांसाठी २० रुपये असते. धुळ्यात जवळपास ५५०० सभासद आहेत. दरम्यान, ज्या कामगारांच्या खात्यातून प्रत्येक वर्षाच्या जून व डिसेंबर महिन्यात कामगार कल्याण निधी कपात होत असतो, त्यांच्याच पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असतो.

धुळे जिल्ह्यात धुळ्यात दोन, शिरपूरला एक कामगार कल्याण मंडळ असून, दोंडाईचात कामगार भवन आहे. धुळे जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात ५०० विद्यार्थ्यांना १३ लाख ५०० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जवळपास ३२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले असून, त्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल. शिष्यवृत्तीची एकत्रित रक्कम ८ ते १० लाखांपर्यंत असेल असेही सांगण्यात आले.

गंभीर आजार असणाऱ्यांनाही मदत

गंभीर आजार असलेल्या कामगारांनाही या मंडळातर्फे अनुदान देण्यात येत असते. साधारत: पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येत असते. २०१९-२० या वर्षात १६ कामगारांना ४ लाखांपर्यंत तर २०२०-२१ या वर्षात ५ जणांना एक लाखांपर्यंत मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या योजनेचा लाभ एस.टी. महामंडळ, एमएसईबी, कृउबा, इन्शुरन्स कंपन्या, हॉस्पिटल्स, दुकाने, एलआयसी, बॅँका, पतसंस्था, महाबीज महामंडळ, वर्कशॉप, साखर कारखाना तसेच एमआयडीसी क्षेत्रातील सर्व कंपन्या, कारखाने, विविध कार्यालयांत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना याचा लाभ मिळत असतो.